महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनधारकांचे पोस्टकार्ड अभियान

By

Published : Aug 24, 2019, 11:15 AM IST

Updated : Aug 24, 2019, 1:01 PM IST

पालघर जिल्हा कार्यकारिणीची पोस्टकार्ड अभियानासंदर्भात संपन्न झालेल्या बैठकीत जिल्ह्यातून किमान अडीच हजार पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्धार झाल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनधारक पोस्टकार्ड अभियान सुरू करणार

पालघर -भाजपनेच मागणी केलेल्या कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे भाजपचे सत्तेवर आल्यावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवून त्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्ह्यातून किमान अडीच हजार पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्धार झाल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले.

पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनधारक पोस्टकार्ड अभियान सुरू करणार

ईपीएस-९५ पेन्शनधारकांना सध्या एक ते अडीच हजार पेन्शन मिळते. भगतसिंग कोशियारी समिती ही भाजपच्या मागणीनुसार नेमण्यात आली होती. या समितीने किमान तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळाल्यास या देशातील निवृत्त कर्मचारी समाधानी होतील, अशी शिफारस केली होती. मोदींनी सत्तेवर येताच या अहवालाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आपल्या पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारने याकडे दुर्लक्ष केले, यासाठी आता नव्याने सुरुवात केली जाणार असल्याचे अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले आहे.

पेन्शनधारकांचे पोस्टकार्ड अभियान
पेन्शनधारकांचे पोस्टकार्ड अभियान

ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवणार

नव्याने बहूमत प्राप्त करुन सरकार बनविणार्‍या पंतप्रधानांचे ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरातून पंतप्रधानांच्या नावे पोस्टकार्ड पाठविण्याचे अभियान चालविण्यात येणार आहे. ईपीएस-९५ समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपूर येथे पार पडली. मोदी सरकारच्या मागील कालावधीत विविध आंदोलनाद्वारे पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करूनही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नव्याने पूर्ण बहुमत प्राप्त करून आलेल्या पंतप्रधानांचे लक्ष ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी देशभरातून पंतप्रधानांचे नावे पोस्टकार्ड पाठविण्याचे अभियान चालविण्यात येणार आहे.

भगतसिंग कोशियारी समिती

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील सर्व कामगारांसाठी केंद्र सरकारने 16 नोव्हेंबर 1995ला नवीन पेन्शन योजना (ईपीएस - 95) सुरू केली. आज या योजनेचे 65 लाख पेन्शनधारक आणि 18 कोटी कार्यरत सदस्य आहेत. ही योजना अत्यंत घाईघाईने सुरू करण्यात आल्याने दर दोन वर्षांनी तिचा आढावा घेण्याचे शासन पातळीवरून ठरले. मात्र पंधरा वर्षात याचा आढावा न घेतल्याने तत्कालीन भाजप नेते आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकरांनी हा मुद्दा राज्यसभेत लावून धरला. त्यामुळे तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समितीची स्थापना केली होती.

Intro:कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे सत्तेवर आल्यावरही दुर्लक्ष; ईपीएस्-95 पेन्शनधारक पंतप्रधान मोदींना पोस्टकार्ड पाठवून वेधणार लक्ष
Body:कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे सत्तेवर आल्यावरही दुर्लक्ष; ईपीएस्-95 पेन्शनधारक पंतप्रधान मोदींना पोस्टकार्ड पाठवून वेधणार लक्ष

नमित पाटील,
पालघट, दि.23/8/2019

पेन्शनवाढीसाठी अनेक आंदोलने करूनसुद्धा
भाजपनेच मागणी केलेल्या कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे सत्तेवर आल्यावरही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार पेन्शनधारकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्डद्वारे पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत.


केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील सर्व कामगारांसाठी केंद्र सरकारने 16 नोव्हेंबर 1995 रोजी नवीन पेन्शन योजना (ईपीएस - 95) सुरू केली. आज या योजनेचे 65 लाख पेन्शनधारक आणि 18 कोटी कार्यरत सदस्य आहेत. ही योजना अत्यंत घाईघाईने सुरू करण्यात आल्याने दर दोन वर्षांनी तिचा आढावा घेण्याचे शासन पातळीवरून ठरले. मात्र पंधरा वर्षात याचा आढावा न घेतल्याने तत्कालीन भाजप नेते आणि राज्यसभा खा. प्रकाश जावडेकरांनी हा मुद्दा राज्यसभेत लावून धरला. त्यामुळे तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समितीची स्थापना केली. स्वत: जावडेकरही या समितीचे सदस्य होते. या समितीने किमान 3 हजार रुपये मासिक पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस केली. मात्र तत्कालीन सरकारने अहवाल न स्वीकारल्याने आम्ही सत्तेवर येताच या अहवालाची अंमलबजावणी करु असे आश्वासन जावडेकर, नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी यांनी 2014 च्या निवडणूक प्रचारात दिल्याचे समितीचे पदाधिकारी अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले. मात्र, पाच वर्षात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करु नही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

आज या योजनेद्वारे मिळणारे पेन्शन मासिक एक हजार ते अडीच हजार रुपये इतके अत्यल्प आहे. राष्ट्र घडविण्यासाठी आयुष्यातील उमेदीचा काळ घालविलेले वृद्ध आज वैफल्यग्रस्त आणि अगतिक अवस्थेत जगत आहेत. त्याचप्रमाणे 4 ऑक्टोबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जास्त वेतन जास्त पेन्शनबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणीही केंद्र सरकारकडून टाळली जाते आहे. त्यामुळे देशभरातील मोठा घटक आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

ईपीएस - 95 समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपूर येथे पार पडली. मोदी सरकारच्या मागील कालावधीत विविध आंदोलनाद्वारे पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करु नही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. आपणच मागणी केलेल्या कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातून पंतप्रधानांच्या नावे पोस्टकार्ड पाठविण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातून तब्बल अडीच हजार पोस्टकार्ड पाठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details