पालघर- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गोर-गरीब आदिवासींचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमी मार्क्सवादी पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी पूरग्रस्त भागात पाहणी केली. तसेच येथील नुकसानग्रस्त आदिवासींना मदत केली.
या वेळी आ. निकोले म्हणाले की, या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे ते भरून न येण्यासारखं आहे. मध्यंतरी पालघर जिल्हातील डहाणू, तलासरी भागात मुसळधार अतिपावसामुळे येथील आदिवासी बांधवाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे आम्ही सायवन, नीबापूर, बापूगाव, गागोडी, कास पाडा या गावात भेट देऊन आम्ही तेथील झालेली नुकसान बघितले. काही जणांचे घराच्या पत्र उडवून गेलेले आहेत, तर काही जण पूर्ण बेघर झालेली आहेत. महत्वाचे म्हणजे लॉककडाउन काळात बेरोजगार झालेले आदिवासी कसे तरी आपले जीवन शेती करून जगत आहेत. पण या निसर्ग आपत्तीमुळे यांचे खूप नुकसान झाले आहे.