महाराष्ट्र

maharashtra

नाशिक...म्हणून 45 दिवस वणी सप्तशृंगी मातेचे मंदिर राहणार बंद

By

Published : Jul 14, 2022, 3:54 PM IST

भाविकांना पहिल्या पायरीवर नतसमस्त होते येणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालया नजीक श्री भगवतीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. तसेच दरम्यान भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तीनिवास व इतर सुविधा या कायम असणार आहे, असेही मंदिर प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले आहे.

temple of wani saptashrungi mata will remain closed for 45 days in nashik
45 दिवस वणी सप्तशृंगी मातेचे मंदिर राहणार बंद

नाशिक - वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर 45 दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 22 जुलैपासून 5 सप्टेंबर पर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद राहणार आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचना देखील शासनाच्या पुरतत्व विभागाकडून देण्यात आल्यात आहेत.

भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन -येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवर नतसमस्त होते येणार आहेत,यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालया नजीक श्री भगवतीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे तसेच दरम्यान भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्तीनिवास व इतर सुविधा या कायम असणार आहे असेही मंदिर प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले आहे.


कोरोना काळात ही मंदिर होते बंद -कोरोनामुळे सलग दीड वर्षे सप्तशृंगी देवीच्या मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं,मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते,अशात आता भाविकांची भक्ती कायम राहावी म्हणून 45 दिवसात केवळ मंदिर बंद राहणार आहे, सप्तशृंगी मातेचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहिल्या पायरीवरून दर्शन घेता येणार आहे.

काल झाला होता अपघात -दिनांक 11 जुलैला दुपारच्या सुमारास संततधार पावसामुळे सप्तशृंगगडावर ढगफुटी सारखा प्रकार घडला होता. यात मंदिराच्या वरील बाजूने उतरत्या मार्गावर पुरासारखी परिस्थिती तयार झाली. त्यात मोठ्या संख्येने डोंगरावरून दगड,माती आणि झाड वाहून आली होती,यावेळी या मार्गेने मार्गक्रमण करणारे सात भाविक किरकोळ जखमी झाले होते,विश्वस्त संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांना सुखरूप खाली आणून त्यांना योग्य ते उपचार देवू केलेत यात त्यांना किरकोळ ईजा झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details