महाराष्ट्र

maharashtra

Anti Witchcraft Law : अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा, नाशिकमधील साधू महंत आज करणार आंदोलन

By

Published : Jan 23, 2023, 11:06 AM IST

Updated : Jan 23, 2023, 12:24 PM IST

repeal of anti witchcraft law

अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिकमधील साधू महंत आक्रमक झाले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात असून हा कायदा महाराष्ट्रातून रद्द करावा, यासाठी नाशिक येथील रामकुंड येथे साधू, महंत, नागा संन्यासी, पुरोहित संघ व हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येत आंदोलन करणार आहे.

प्रतिक्रिया देताना साधू महंत

नाशिक :नाशिक येथील रामकुंड परिसरात दुपारी साधू महंत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी सर्व साधू महंत, नागा संन्यासी, हिंदुत्ववादी संघटना, पुरोहित संघ आणि धर्मशास्त्र अभ्यासक हे सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाला एक निवेदन देणार आहेत. त्या माध्यमातून ते राज्य सरकारला अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहेत.

अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा :अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात कोणी नाही. मात्र, तसे करताना धर्मातील श्रद्धांवर आघात होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ती काळजी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात न घेतल्याने गंभीर चुका झाल्या आहेत. त्यामुळ त्याला विरोध करण्यात येत आहे, सरकारला संयुक्त चिकित्सा समितीकडे तो अभ्यासासाठी पाठवावा लागला होता. मात्र, सरकारने त्यात मांडलेले कोणतेही आक्षेप दूर न करता 2011 मध्ये केवळ नाव बदलून हा कायदा परत आणला आहे. त्याला महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम असे फसवे नाव देऊन तो मंजूर करण्यात आला आहे, असा आरोप साधू महंतांनी केला आहे. शासनाने लागू केलेल्या या कायद्याचा उद्देश भरकटला असल्याचा आरोप नाशिक येथील महंतांनी केला आहे. फक्त हिंदूंना आणि हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

अघोरी साध्वी कर्मठ शिवानी दुर्गा जी :प्रत्येक समुदाय, धर्मसंप्रदायाला मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. शास्त्र, वेद, पुराणांनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जो अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. त्याचा पूर्णपणे बहिष्कार करते, असे अघोरी साध्वी कर्मठ शिवानी दुर्गा जी म्हणाल्या.

जैन आचार्य सूर्यसागरजी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावावर व्यापार होत आहे. देशाला बदनाम केले जात आहे. सनातानाला बदनाम केले जात आहे. हिंदू साधू संन्यांसाविरूद्धच फक्त हे कार्य केले जात आहे. सरकारला विनंती आहे की, या समितीला रद्द करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे गुजरातचे जैन आचार्य सूर्यसागरजीम्हणाले.

अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज : अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा उद्देश कुठे न कुठे भरकटला आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे नाशिकचे अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज म्हणाले.

काय आहे कायदा : कथितपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने प्राणघातक अत्याचार,जबरदस्तीने मानवी शरीरात मिसळणे, लैंगिक अत्याचार, ब्रांडिंग इ. चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे. अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात आणणारी किंवा गंभीर दुखापत होणारी कृती करणे किंवा प्रोत्साहित करणे.

मानवी बलिदानाचे पालन :काही इनाम किंवा पुरस्काराच्या शोधात अमानुष कृत्ये किंवा मानवी बलिदानाचे पालन करणे किंवा प्रोत्साहित करणे. एखाद्या व्यक्तीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पाडतात अशी भावना निर्माण करणे. एखाद्या व्यक्तीवर काळा जादू करण्याचा किंवा सैतानचा अवतार असल्याचा आरोप, त्याच्यावर किंवा तिच्यावर रोग किंवा दुर्दैवी कारणीभूत असल्याचा आरोप करणे आणि त्या व्यक्तीला त्रास देणे.

काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप : एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप करणे, त्याला नग्न करणे व तिचे नग्न करणे आणि त्या व्यक्तीच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा आणणे. भुतांना चिघळण्याच्या क्षमतेचा दावा करणे, घबराट निर्माण करणे किंवा इतरांना भीती घालवून भुतांना हाक मारण्याची धमकी देऊन किंवा ताब्यात घेण्याची भावना निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे आणि त्याला किंवा तिला अमानुष कृत्ये करण्यास भाग पाडणे.

अलौकिक शक्ती असल्याचा दावा : कुत्रा, साप किंवा विंचू चाव्याद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्यापासून रोखणे आणि त्याला जादूचे उपाय करण्यास भाग पाडणे. बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा दावा आणि जन्म न घेतलेल्या गर्भातील लिंग बदलण्याचा दावा. मागील अवतारातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असल्याचा दावा करणे आणि त्यांना लैंगिक कृतींमध्ये एकत्र करणे आणि नपुंसक स्त्रीला बरे करण्यासाठी अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि त्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे. एखाद्या मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि अशा व्यक्तीचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करणे.

काय आहे शिक्षा :जरी नरबळी आधीपासूनच भारतात खून मानला जात असला, तरी मानवी त्यागास प्रोत्साहित करणे याचा देखील कायद्यात समावेश केला गेला आहे. प्रत्येक उल्लंघन कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते. ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत. हा कायदा दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक व प्रशिक्षण, तसेच या गुन्ह्यांचा तपास करून स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल देण्याचे निर्देश देतो. या अधिकाऱ्यांची पत पोलिस निरीक्षकाच्या रँकपेक्षा जास्त असावी.

हेही वाचा : Suspected of witchcraft : जादुटोणा केल्याच्या संशयातून महिलेला स्मशानभूमीत मारहाण

Last Updated :Jan 23, 2023, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details