नाशिक :त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात संदल उरूसची अनेक वर्षांची परंपरा आहे, असे सांगून काही समाजकंटकांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या प्रवेश द्वारावर पहिल्या पायरीवर धूप दाखविण्याच्या प्रकाराला धार्मिक रंग दिला. त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. अशा घटना त्र्यंबकेश्वर सह संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात आमदार नितेश राणे, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके त्र्यंबकेश्वर राजांची महाआरती केली आहे.
काय आहे प्रकरण :त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी रात्री ही घटना घडली होती. दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिराच्या परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.