महाराष्ट्र

maharashtra

कलम ३७० हटवल्याने आता काश्मीरमध्ये फुटीरता वाढणार नाही - प्रा. शेषराव मोरे

By

Published : Aug 5, 2019, 11:51 PM IST

कोणत्याही संघराज्यात घटक राज्यांना कमीतकमी अधिकार असणे, हे त्या संघराज्यासाठी हिताचे असते. कलम ३७० हटवल्याने आता काश्मीरमध्ये फुटीरता वाढणार नाही. कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मीरमध्ये आता इतर राज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल.

कलम ३७० हटवल्याने आता काश्मीरमध्ये फुटीरता वाढणार नाही - प्रा. शेषराव मोरे

नांदेड - राज्यांना कमीतकमी अधिकार असावेत त्यामुळे फुटीरता वाढत नाही. कलम ३७० रद्द केल्यामुळे आता काश्मीरमध्येही इतर राज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. देशात एकसंघता निर्माण होऊन सदरील राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मत इतिहास तज्ञ प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केले आहे.

कलम ३७० हटवल्याने आता काश्मीरमध्ये फुटीरता वाढणार नाही - प्रा. शेषराव मोरे

प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :

  • कलम ३७० रद्द केल्यामुळे आता तिथे इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. देशात एकसंघता निर्माण होईल.
  • काश्मीरमध्ये असणारे अनेक कायदे रद्द होतील. काश्मीरच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळेल.
  • सुरूवातीला काश्मीरची जनता विरोध करतील पण नंतर त्यांना याचा फायदा समजून येईल.
  • सध्या काही दिवस थोडे विरोधी पडसाद उमटतील पण भविष्यात त्याठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल.
  • भांडवलदारही त्या ठिकाणी गुंतवणूक करून नवीन उद्योग व कारखाने आणू शकतील. यामुळे बेरोजगारी कमी होईल.
  • काश्मीर प्रश्नात इतर कुणीही मध्यस्थी करून उपयोग नाही. त्या भागातील जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत.
  • संयुक्त राष्ट्र संघामध्ये अगोदरच हा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर यात आपलीच बाजू भक्कम आहे.
  • काश्मीर भारतात राहणे आवश्यक होते आणि आहे. यासाठी कलम ३७० हटवणे आवश्यक होते.
Intro:नांदेड:राज्याला कमीत कमी अधिकार असावेत त्यामुळे फुटीरता वाढत नाही. कलम ३७० रद्द केल्यामुळे आता इतर राज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. त्याठिकाणचे अनेक कायदे रद्द होतील. देशात एकसंघता निर्माण होऊन सदरील राज्याच्या विकासाला चालना मिळेल असे मत इतिहास तज्ञ या विषयाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी ईटीव्ही शी बोलताना व्यक्त केले.


Body:
नांदेड:राज्याला कमीत कमी अधिकार असावेत त्यामुळे फुटीरता वाढत नाही. कलम ३७० रद्द केल्यामुळे आता इतर राज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. त्याठिकाणचे अनेक कायदे रद्द होतील. देशात एकसंघता निर्माण होऊन सदरील राज्याच्या विकासाला चालना मिळेल असे मत इतिहास तज्ञ या विषयाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. शेषराव मोरे यांनी ईटीव्ही शी बोलताना व्यक्त केले.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सध्या काही दिवस त्या ठिकाणी या बाबतीत थोडे पडसाद उमटतील. पण भविष्यात याठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल. तसेच भांडवलदारही त्या ठिकाणी गुंतवणूक करून नवीन उद्योग व कारखाने आणू शकतील. काश्मीर प्रश्नात इतर कुणीही मध्यस्थी करून उपयोग नाही. तर त्या भागातील जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत.असे म्हणाले.
युनो मध्ये अगोदरच हा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर यात आपलीच बाजू भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. कश्मीर हा भारतात राहणे आवश्यक होते आणि आहे इतर काही घडले असते तर त्याचा या देशात परीणाम घडला असता ते म्हणाले.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details