महाराष्ट्र

maharashtra

Bharat Rashtra Samiti : तज्ञ म्हणतात, बीआरएस पक्षला महाराष्ट्रात मूळ धरता येणार नाही

By

Published : Jan 19, 2023, 3:07 PM IST

Updated : Jan 19, 2023, 6:07 PM IST

Chief Minister K. Chandrasekhar Rao
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत आमूलाग्र फरक आहे. त्यामुळे केसीआर यांचा राजकीय पक्ष महाराष्ट्रात मूळ धरू शकणार नाही. याबाबत भाजप आणि काँग्रेस मध्ये एकमत आहे. त्यासाठी नुकतेच बीआरएसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांदेडात सभेसाठी जागेची पाहणीही केली होती. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही सभा होण्याची चिन्हे होती. परंतु, शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेने बीआरएसच्या एंट्रीत खोडा घातला आहे.

बीआरएस पक्ष, महाराष्ट्रात मूळ धरू शकणार नाही

नांदेड : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या योजनांची भुरळ सीमावर्ती भागातील काही गावांना पडली. त्यातच त्यांनी आपली गावे तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यासाठी समन्वय समितीने सीमावर्ती भागात संपर्क संवाद अभियानही राबविले. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्ती भागातील गावांसाठी विशेष योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या सर्व घटनाक्रमात बीआरएसच्या महत्त्वाकांक्षा मात्र वाढल्या आहेत.

केसीआरच्या सभेसाठी जागेची पाहणी : तेलंगणाच्या बाहेर आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी बीआरएसला नांदेड हे सोयीचे वाटते. विशेष म्हणजे यापूर्वी एमआयएमने ही तेलंगणाबाहेर नांदेडातूनच सुरुवात केली होती. या पक्षाला २०११ च्या महापालिका निवडणुकीत चांगले यशही मिळाले होते. परंतु, त्यानंतर पक्षाला हे यश टिकविता आले नाही. त्याच धर्तीवर बीआरएसनेही नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडात मुख्यमंत्री केसीआरच्या सभेसाठी जागेची पाहणीही केली होती.



आता फेब्रुवारीचा मुहूर्त : आता फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच बीआरएस महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उतरणार आहे. त्याचा फटका कुणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील धर्माबाद, बिलोली, किनवट, माहूर, देगलूर आणि भोकर या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत तेलगू भाषिकांवर बीआरएसची अधिक मदार राहणार आहे.



नांदेड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती :नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची चांगली पकड आहे. महापालिकेमध्ये एकहाती सत्ता आहे. विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ४ आमदार आणि विधापरिषदेत 1 आमदार आहे. त्याउलट भाजपचा 1 खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जोरदार यश मिळवले होते. तेलंगणातील पक्षाची सुरूवात ही महाराष्ट्रातून झाली आहे. विशेष म्हणजे नांदेडमधून ओवैसी यांच्या MIM पक्षाने १२ नगरसेवक निवडून आणले. मात्र २०१७ च्या महापालिका निवडणुकीत MIM ला खातेदेखील उघडता आले नाही.

मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा : याआधीहैदराबाद स्थित एमआयएम या राजकीय पक्षानंतर तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा भारत राष्ट्र समिती हा राजकीय पक्ष नांदेडमध्ये प्रवेश करू पाहत आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेवरच्या तेलगू भाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा होती. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा मानस तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत.



हेही वाचा : Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार नांदेडमध्ये होणार बीआरएस पक्षाची पहिली जाहीर सभा

Last Updated :Jan 19, 2023, 6:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details