नागपूर:वेदांताच्या संदर्भात आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत. माहितीच्या अधिकारातुन काही माहिती समोर आली आहे, त्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडी सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नव्हती. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे.
शासकीय जीआर: उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्याचे प्रतिनिधी कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar यांनी केला आहे. ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.
या काळात पीक विमा कंपन्यांची चांदी: महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, खरे मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही जिल्हा पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होते. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचाही लक्ष नव्हतं.