महाराष्ट्र

maharashtra

गोस्वामी आक्रमक बोलतात, मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात वाट्टेल ते बोललेले चुकीचे नाही का?

By

Published : Nov 4, 2020, 4:02 PM IST

Updated : Nov 4, 2020, 6:14 PM IST

अर्णब गोस्वामी यांची अटक हा काही तीन वर्षांपूर्वीच्या खटल्याचा विषय नाही, तर सोनिया गांधींचा शिवसेनेवर दबाव आहे. अर्णब गोस्वामी तुमची प्रकरणे बाहेर काढतो, असे म्हणत तीन वर्षे जुनी फाईल तुम्ही सुडा पोटी पुन्हा खुली करता, हे अत्यंत चुकीचे आहे. गोस्वामी हे आक्रमक बोलतात मग मुख्यमंत्र्यांनीही दसरा मेळाव्यात वाट्टेल ते बोलले ते चुकीचे नाही का? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

नागपूर
नागपूर

नागपूर- पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून महाराष्ट्र सरकार दडपशाही करत आहे. शिवाय आजचा दिवस हा काळा दिवस आहे. अर्णब गोस्वामी यांची अटक हा काही तीन वर्षांपूर्वीच्या खटल्याचा विषय नाही, तर सोनिया गांधींचा शिवसेनेवर दबाव आहे. अर्णब गोस्वामी तुमची प्रकरणे बाहेर काढतो, असे म्हणत तीन वर्षे जुनी फाईल तुम्ही सुडा पोटी पुन्हा खुली करता, हे अत्यंत चुकीचे आहे. गोस्वामी हे आक्रमक बोलतात मग मुख्यमंत्र्यांनीही दसरा मेळाव्यात वाट्टेल ते बोलले ते चुकीचे नाही का? असा सवालही यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

माहिती देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

त्यामुळे या घटनेचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नागपुरात या घटनेच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांच्या नेत्तृत्वात आंदोलन करण्यात आले. शिवाय पत्रकारांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शहरातील टिळक पुतळा चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारला स्वतःवरची टीका सहन होत नाही

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून आज सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारला स्वतःवरची टीका सहन न झाल्यामुळे एका पत्रकारावर अन्याय केला जात आहे. ही घटना अत्यंत निंदणीय आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यभर काळी फित लावून आंदोलन करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

अर्णब गोस्वामींची सुटका होईपर्यंत काळी फित

चंद्रकांत पाटील हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. अर्णब गोस्वामींना अटक झाल्यानंतर भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जिल्ह्यातही सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाय आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा जोरदार निषेधही करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अर्णब गोस्वामी यांची सुटका होईपर्यंत काळी फित लावावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

अर्णब गोस्वामी यांना अटक हा काही तीन वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा विषय नाही तर सोनिया गांधीचा शिवसेनेवर दबाव असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. इंदिरा गांधीनी त्या काळी प्रयत्न करून पाहिला परंतु सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे ही घटना अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या घटनेचा भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Last Updated :Nov 4, 2020, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details