महाराष्ट्र

maharashtra

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; मागून येणाऱ्या दुसऱया गाडीने ठोकले

By

Published : Dec 12, 2022, 9:49 PM IST

Updated : Dec 12, 2022, 10:13 PM IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Emperor of Hindu Heart ) महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ( Balasaheb Thackeray samruddhi Highway ) आज अपघात झाला आहे. लोकार्पण झाल्यानंतर 24 तास पूर्ण होण्यापूर्वीचं दोन कारची धडक झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

car accident Samriddhi Highway
car accident Samriddhi Highway

नागपूर -कालचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister of the country Narendra Modi ) यांच्या हस्ते हिंदूह्रयदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ( Emperor of Hindu heart ) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ( Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Highway ) लोकार्पण झालं होत. या कार्यक्रमाला 24 तास पूर्ण होण्यापूर्वीचं एक मोठा अपघात झाला आहे. वायफळ टोल नाक्यावर एक कार हळुवार जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली. त्यामध्ये टोल नाक्यावर समोर असलेल्या कारचे मोठे नुकसान झाले.

कारचे मात्र मोठे नुकसान -आज झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. आज त्याच ठिकाणी अपघात ( car accident Samriddhi Highway ) झाला आहे.

कालचं झाले लोकार्पण -हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Emperor of Hindu Heart ) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. पहिला टप्पा नागपूरला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मंदिर शहराशी 520 किमी अंतरावर जोडतो. प्रकल्पाची लांबी ७०१ किमी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाने आकार घेतलेला आहे. हा एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्याने नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ सात तासांवर येईल.

सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किमीचा द्रुतगती मार्ग - हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे अमरावती, औरंगाबाद, नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास यामुळे मदत होईल.

Last Updated :Dec 12, 2022, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details