हिंगोली - मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात वाढले आहे. देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका शेतकऱ्याने मध्यरात्रीच्या सुमारास बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजाराम नामदेव गाढवे (वय-५३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
स्वातंत्र्यदिनीच हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना सेनगाव तालुक्यातील सवना येथे शेतकऱयाने मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्वातंत्र्य दिवस असल्याने घरातील कुटुंबीय बाहेर आले होते. यावेळी त्यांना राजाराम यांचा मृतदेह घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यानंतर संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली.
शेतकरी गाढवे यांच्या नावावर तीन एकर शेती असून, त्यावर खाजगी कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सर्व गावावर शोककळा पसरली आहे.
सवना येथील घटना
हिंगोली- जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून शेतकरी आत्महत्याचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे काही केल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नसल्याचे भयंकर चित्र दिसून येत आहे आजही सवना येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनीच आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजाराम नामदेव गाढवे (५३) अस मयत शेतकऱ्याच नाव आहे.
.Body:आज एकिकडे स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा होत असताना, अन एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना सेनगाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी गाढवे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज स्वातंत्र्य दिवस असल्याने नेहमीप्रमाणे घरातील मंडळी घराबाहेर आली होती, तर त्यांना शेतकरी गाढवे यांचा मृतदेह घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्यावस्थेत आढळून आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला अन शवविच्छेदनासाठी मृतदेह गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात हलविला. शेतकरी गाढवे यांच्या नावावर तीन एकर अल्पभूधारक शेती असून त्यांच्यावर काही खाजगी कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याला चक्क स्वातंत्र्यदिनीच कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपल्याने मात्र गावांसह जिल्ह्यात शोककळा पसरलीय. Conclusion:जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच चाललाय.