महाराष्ट्र

maharashtra

विविध नेटवर्क कंपनी विरोधात स्वाभिमानीचे बुलडाण्यात शोले स्टाईल आंदोलन

By

Published : Oct 17, 2020, 7:41 PM IST

इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा बंद असल्याने अनेकांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असल्याने त्यांना ही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. अनेकांना व्यवसायातही लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व कंपन्या ग्राहकांची मोठी फसवणूक करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी केली.

swabhimanis show style movement against various network companies in buldhana
विविध नेटवर्क कंपनी विरोधात स्वाभिमानीचे बुलडाण्यात शोले स्टाईल आंदोलन

बुलडाणा -गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह इतरांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी आज शनिवारी 17 ऑक्टोबरला बुलडाण्यातील जिल्ह्यातील अटाळी येथील नेटवर्क सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या टॉवरवर चढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाम अवथळे यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलन केले.

विविध नेटवर्क कंपनी विरोधात स्वाभिमानीचे बुलडाण्यात शोले स्टाईल आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जिओ, एयरटेल, आयडिया, व्होडाफोन बीएसएनएल कंपन्यांचे इंटरनेट नेटवर्क व टेलीकम्युनिकेशन नेटवर्क सातत्याने दोन - दोन , तीन - तीन तास बंद राहत असल्याने ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. या कंपन्या ग्राहकांकडून सेवेसाठी प्रति महिना पैसे आकारतात पण सेवा दिवस - दिवसभर बंद असल्याने ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा बंद असल्याने अनेकांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असल्याने त्यांना ही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे. अनेकांना व्यवसायातही लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व कंपन्या ग्राहकांची मोठी फसवणूक करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी केली.

इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे. तसेच खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे जिओ कंपनीचे इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन टॉवर असून सदर टॉवर हे बेवारस सारखे आहे. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नसतात. या टॉवरसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र नसल्याने टॉवरला वीज पुरवठा हा गावातील विद्युत रोहित्रावरून होत असल्या कारणामुळे गावकऱ्याना अंधरामध्ये राहवे लागत आहे. यामुळे टॉवरद्वारे देण्यात येणारी इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा कायम विस्कळीत असते. त्यामुळे सदर टॉवरद्वारे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी सदर कंपनीला आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे. जर आठ दिवसाच्या आत सदर कंपन्यांकडून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व टॉवरची तोडफोड करेल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details