औरंगाबाद :एमआयएम पक्ष वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. आमच्या एमआयएम पक्षाकडे युवक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आमच्याकडे झालेल्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतात. भाजप सरखे आम्ही पैसे देऊन प्रसिद्धी मिळवत नाही. आमचा सोशल मीडिया सर्वात भक्कम आहे, तोही कोणतेही पैसे न देता फुकट काम करतो अशी टीका इम्तियाज जलील यांनी भाजपवर केली.
एनिमी जमिनीबाबत अधिवेशनात आवाज उचलणार : औरंगाबादच्या कटकट भागातील 22 एकर जागा एनिमी जमीन म्हणजे शत्रू जमीन असल्याची नोटीस केंद्र सरकारच्यावतीने बजावण्यात आली. 2018 मध्ये या नोटीस बजावण्याचे काम सुरू झाले. मात्र इतके दिवस सरकार झोपली होती का? असा संतप्त प्रश्न खासदार इम्तियाज दिलेली यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना भेटणार असून अधिवेशनात देखील हा मुद्दा आम्ही मांडणार असल्याचा त्यांनी सांगितलं. त्याशिवाय ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. ठाकरे आणि शिंदे गट यांच्या वादामुळे आमच्यावर कोणही टीका करत नाही. त्यामुळे त्यांनी भांडावं आम्ही तमाशा पाहत आहोत असे, खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
मोदींवर टीकास्त्र : इतकी वर्ष झाली लोक तिथे राहतात, त्यांना सुविधा दिल्या जातात, त्याच्या बदल्यात ते कर देखील भरतात. त्यांच्या नावावर त्यांची घर देखील आहेत. मात्र आता अचानक हे झोपेतून उठले का? मोदी म्हणतात की आम्ही बेघरांना घर देऊ, मग आता यांना त्यांच्या घरातून कसे काढता? याबाबत आता जनता आवाज उठवेल आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.