महाराष्ट्र

maharashtra

T20 World Cup मध्ये भारत- पाकिस्तान संघात झाले 11 सामने, जाणून घ्या भारताचा रेकॉर्ड ब्रेक विजय

By

Published : Oct 21, 2022, 7:03 PM IST

Updated : Oct 21, 2022, 8:09 PM IST

T20 सामन्यांच्या इतिहास आणि आकडेवारीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने 7 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने केवळ 3 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. पहिल्या टाय झालेल्या सामन्यापासून आतापर्यंतच्या संपूर्ण रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

India vs Pakistan Team India Records
India vs Pakistan Team India Records

मेलबर्न: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात, टीम इंडिया मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर महान सामन्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. या ठिकाणी दोन्ही संघ आपापल्या सुपर 12 मोहिमेला सुरुवात करणार आहेत. भारत पाकिस्तान सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित होतील, अशी अपेक्षा असणार आहे. मात्र पावसाची सुरवात ही सामन्यावर पसरली आहे. 1992 पासून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय आणि T20 विश्वचषकासह खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही. त्याचवेळी पंत या सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक असून त्याला मागील सामन्यातील षटकार आठवत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात तसेच विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताच्या नावावर उत्कृष्ट विक्रम राहणार आहे.

T20 सामन्यात भारत पाकिस्तानT20 सामन्यांच्या इतिहास आणि आकडेवारीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 7 सामने जिंकले आहेत, आणि पाकिस्तानने केवळ 3 सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. पहिल्या टप्पात झालेल्या सामन्यापासून आतापर्यंतच्या संपूर्ण रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

  • 14 सप्टेंबर 2007 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात डरबनमध्ये खेळलेला सामना टाय झाला
  • 24 सप्टेंबर 2007 रोजी जोहान्सबर्ग येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळला
  • 30 सप्टेंबर 2012 रोजी कोलंबोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला.
  • 25 डिसेंबर 2012 रोजी, बंगळुरू येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात, पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव करून पहिला T20 सामना जिंकला.
  • 28 डिसेंबर 2012 रोजी अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला.
  • 21 मार्च 2014 रोजी मीरपूर येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
  • 27 फेब्रुवारी 2016 रोजी मीरपूर येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
  • 19 मार्च 2016 रोजी कोलकाता येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
  • 24 ऑक्टोबर 2021 रोजी, दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात, पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव करून आपला दुसरा विजय नोंदवला.
  • 28 ऑगस्ट 2022 रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया कप सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
  • 4 सप्टेंबर 2022 रोजी, दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आशिया कप सामन्यात, पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सने पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला.
India vs Pakistan Team India Records

50 षटकांच्या विश्वचषक सामन्यांचे आकडे

  • 1992 - सिडनी येथे भारताने पाकिस्तानचा 43 धावांनी पराभव केला
  • 1996- बंगळुरूमध्ये भारताने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला
  • 1999 - मँचेस्टर येथे भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला
  • 2003 - सेंचुरियन मध्ये भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला
  • 2011 - मोहालीमध्ये भारताने पाकिस्तानचा 27 धावांनी पराभव केला (उपांत्य फेरी)
  • 2015 - अ‍ॅडलेड मध्ये भारताने पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव केला
  • 2019 - मँचेस्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला

T20 विश्वचषक सामन्यांचे आकडे

2007 - डरबन येथे झालेल्या टाय सामन्यात भारताने पाकिस्तानला बॉल आऊटने पराभूत केले

2007 - जोहान्सबर्ग येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला

2012 - कोलंबोमध्ये भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला

2014 - ढाका येथे भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला

2016 - कोलकाता येथे भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला

2021 - दुबईत पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने मात केली

India vs Pakistan Team India Records

फलंदाज ऋषभ पंतही खूप उत्साहितइतर खेळाडूंप्रमाणेच दरजेदार फलंदाज करणारा ऋषभ पंतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यांबाबत खूप उत्सुक आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान खेळाडू जेव्हा मैदानात येतात तेव्हा वेगळेच वातावरण निर्माण होते, असे त्यांना वाटते. मेलबर्नमध्ये रविवारी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक सामन्यासाठीही तो घाम गाळत आहे. यादरम्यान पंत म्हणाला, पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच खास असते कारण त्या सामन्याबद्दल नेहमीप्रमाणेच एक विशेष उत्साह असतो. यात केवळ आमच्यासाठीच नाही तर चाहत्यांसाठी आणि प्रत्येकाच्या भावनांचा समावेश असतो.

पंत म्हणाले, ही एक वेगळीच भावना आहे, वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे, जेव्हा तुम्ही मैदानावर जाता आणि मैदानात खेळायला उतरता, तेव्हा तुम्हाला लोक इकडे तिकडे जल्लोष करताना दिसतात. ही एक वेगळीच भावना असते. आणि जेव्हा आपण आपले राष्ट्रगीत गात असतो. खरोखरच अंगात रक्त सळसळत असते. दुबईतील त्या सामन्याची आठवण करून देत असताना पंत म्हणाला की, मला आठवते हसन अलीने एकाच षटकात दोन षटकार मारले होते. आम्ही धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण आम्ही लवकर विकेट गमावल्या होत्या आणि माझी आणि विराटची भागीदारी होती. आम्ही धावा वाढवत होतो. आणि मी त्याला एका हाताने दोन षटकार मारले होते.

Last Updated : Oct 21, 2022, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details