नवी दिल्ली: आयएसएसफ विश्वचषक स्पर्धेत भारताने आपली चांगली कामगिरी केली. यावेळी कोरियाच्या चांगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकाच्या रायफल/पिस्तूल/शॉटगन टप्प्यात अव्वल स्थान मिळवले. भारताने पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण 15 पदके ( India won 15 medals in ISSF ) जिंकली.
बुधवारी अंतिम दिवशी, अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर या भारतीय त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल ( 25 meter rapid fire pistol ) मध्ये रौप्य पदक जिंकले ( Indian mens trio won silver medal ), चेक रिपब्लिककडून 15-17 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या तिघांनीही पात्रतेच्या दोन फेऱ्यांनंतर फायनलमध्ये प्रवेश केला आणि 872 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिले. तसेच सुवर्ण पदकाच्या शॉटसाठी 578 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.