महाराष्ट्र

maharashtra

आरोपी साहिल खानला दोन दिवसात अटक न झाल्यास खेळाडू करणार आंदोलन

By

Published : Sep 24, 2021, 4:11 PM IST

बॉडीबिल्डर मनोज पाटील
बॉडीबिल्डर मनोज पाटील

आरोपी साहिल खानला दोन दिवसात अटक न झाल्यास खेळाडू आंदोलन करतील असा इशारा बॉडीबिल्डर मनोज पाटील यांनी दिला आहे. पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला. ओशिवरा पोलिसांना भेटून न्यायाची विनंती केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुंबई- बॉडीबिल्डर मनोज पाटील मुंबईतील अंधेरी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. मनोज पाटील यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. मनोजने आरोपी साहिल खान आणि त्याच्या साथीदारांना अद्याप अटक न करण्याचे कारण विचारले. पोलिसांनी मनोज पाटीलला आरोपी साहिल खान आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

साहिलला अटक न झाल्यास अॅथलेटिक्स करणार आंदोलन

प्रसारमाध्यमांशी बोलताना बॉडीबिल्डर मनोज पाटील म्हणाले की, मुंबईचे पोलीस हे जगातील नंबर 1चे पोलीस आहेत, पण आज आमच्या बाबतीत एवढी गंभीर बाब असूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. कारण साहिल खान सतत राजकारण्यांच्या संपर्कात असतो. मनोजने सांगितले की, जर पोलिसांनी 2 दिवसात आरोपीला अटक केली नाही, तर तो त्याच्या शेकडो अॅथलेटिक्स खेळाडूंसह ओशिवरा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करेल.

मनोज पाटीलने घेतली पोलिसांची भेट

मनोज पाटीलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

सुवर्णपदक विजेता मनोज पाटील याने आरोपी साहिल खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बॉलिवूडच्या मिस्टर इंडियाला देशासाठी कोणतेही पदक न जिंकण्याची धमकी दिली आहे. साहिल खानच्या वारंवार धमक्यांमुळे मनोज पाटीलने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. पण तो थोडक्यात बचावला. ही बाब माध्यमांसमोर आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी साहिल खान आणि त्याच्या इतर 3 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला पण आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

काही दिवसापूर्वी बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसेच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता, असेही मनोज पाटीने म्हटले आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचे मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

हेही वाचा - साहिल खानविरुद्ध गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत साहिल खान म्हणाला- मनोज पाटील बनावट आणि कालबाह्य स्टिरॉइड्स विकायचा

ABOUT THE AUTHOR

...view details