महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 : आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी पाच महत्वाची आकडेवारी

By

Published : May 30, 2022, 7:04 PM IST

IPL 2022

आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या संघातील फक्त दोन ऑरेंज कॅप विजेते ठरले आहेत. ज्यामध्ये रॉबिन उथप्पा आणि रुतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी पाच महत्वाची आकडेवारी ( Five stats ) पाहूया...

अहमदाबाद -गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. पहिल्या सत्रात चॅम्पियन बनणारा तो या स्पर्धेतील दुसरा संघ आहे. (GT vs RR result) रविवारी (दि. 29 मे)रोजी झालेल्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. (2008)मध्ये राजस्थानने पहिल्या सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले हा योगायोग म्हणावा लागेल. गुजरातने आता राजस्थानच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातचा हा विजय असा मानला जात आहे की, ज्यातून चॅम्पियन संघही धडा घेऊ शकतो. आज आपण आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी महत्वाची पाच आकडेवारी पाहणार ( Five stats blow your mind ) आहोत

1) शुभम गिल शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि गुजरात टायटन्ससाठी एक बाजू सांभाळली. तथापि, अंतिम चेंडूसाठी त्याच्याकडे इतर योजना होत्या आणि गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्या सत्रात आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्यात मदत करण्यासाठी त्याने ते खास शैलीत पूर्ण केले. यासह तो षटकार लगावत संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

2) क्रिकेट हा संघाचा खेळ आहे. आणि जर आकड्यांचा विचार करायचा असेल तर, वैयक्तिक कामगिरीमुळे तुम्हाला आयपीएल सारखे विजेतेपद मिळत नाही हे दिसून येते. उदाहरणार्थ, आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या संघातील खेळाडू ऑरेंज कॅप जिंकली आहे, असे फक्त दोन वेळा झाले. ज्यामध्ये रॉबिन उथप्पा आणि रुतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत आयपीएलच्या 15 हंगामात आयपीएलचा विजेता ठरणाऱ्या संघातील गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे, असे फक्त तीन वेळा झाले आहे.

यामध्ये सोहेल तन्वीर, आरपी सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर फक्त तीनदाच असे झाले आहे की, प्लेअर ऑफ टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूच्या संघानेच जेतेपद पटकावले आहे. या कामगिरीमध्ये शेन वॉटसन, अॅडम गिलख्रिस्ट आणि सुनील नरेन समावेश आहे.

3) आयपीएलच्या एका हंगामात एकाच संघाकडून ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळाल्याची केवळ तीनच घटना घडल्या आहेत.

2013: हसी आणि ब्राव्हो (उपविजेता)

2017: वॉर्नर आणि भुवनेश्वर (प्ले ऑफ)

2022: बटलर आणि चहल (उपविजेता)

4) 29 मे रोजी, विराट कोहलीने आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा (973 ) धावा केल्या होत्या आणि त्याला सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स संघ फायनल सामन्यात पराभूत झाला होता. त्याचबरोबर या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

कारण आयपीएल 2022 मध्ये त्याच दिवशी, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर हा सर्वाधिक 863 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. ज्यामुळे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तसेच त्याला सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु त्याच्या संघाला म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघाला फायनल सामन्यात पराभव पत्कारावा लागला.

5) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हा एकमेव संघ आहे, जो अद्याप कोणत्याही आयपीएल हंगामाची शेवट गुणतालिकच्या तळाला केलेला नाही.

हेही वाचा -Ipl 2022 Closing Ceremony Photos : आयपीएल समारोप सोहळ्याची झलक; पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details