गुयाना: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यातही भारतीय फलंदाजी कुचकामी ठरली. या पराभवासह टीम इंडिया पाच टी20 सामन्याच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. संघात यंग बिग्रेड असताना ही भारतीय संघाचा पराभव का झाला? याची कारणे आपण जाणून घेऊ..
दुसरा पराभव: गुयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघात दुसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी घेऊन वेस्ट इंडिजपुढे मोठे आव्हान देण्याचा पांड्याचा प्लान फसला. कारण भारतीय सलामीवीर फलंदाजीची जोडी यावेळीही अपयशी ठरली. भारताने दिलेले 153 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 19 षटकात पार केले.
8 गडी गमावूनही जिंकला सामना: टीम इंडियाची सलामीवीर जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. भारतीय फलंदाज तिलक वर्माच्या 51 आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या 24 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 152 धावांचा टप्पा पार केला. 153 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने 129 धावांवर 8 गमावले. हे पाहून भारतीय संघ सामना सहज जिंकेल असेल असे प्रत्येकाला वाटत होते. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजला 24 चेंडूमध्ये 24 धावा आवश्यक होत्या आणि हातात शेवटचे दोन गडी बाकी होते. त्यावेळी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला जोसेफने अकील हुसैनच्या मदतीने 26 धावांची पार्टनरशीप केली. या दोघांनी 17 चेंडूंमध्येच 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
पांड्याचे निर्णय चुकले: कर्णधार हार्दिक पांड्याचे या सामन्यात 2 निर्णय चुकले. हे निर्णयही टीम इंडियाच्या पराभवाचा कारण बनले. या सामन्यात टीम इंडिया 6 गोलंदाजांसह मैदानात उतरली होती. परंतु कर्णधाराने फक्त 5 गोलंदाजांचा उपयोग केला. वेस्ट इंडिजविरुद्ध अक्षर पटेलला गोलंदाजीची संधी मिळालीच नाही. वेस्ट इंडिजने चौथ्या ओव्हरमध्ये 32 धावात 3 विकेट गमावले होते.