महाराष्ट्र

maharashtra

Ind Vs Aus Second ODI : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव; 117 धावातच गुंडाळले, 4 फलंदाज शून्यावर बाद

By

Published : Mar 19, 2023, 6:34 PM IST

दुसऱ्या वनडेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसमोर भारतीय संघ 117 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाची विशाखापट्टणममध्ये वनडेमध्ये 117 धावांची ही सर्वांत कमी धावसंख्या आहे.

IND VS AUS 2ND ODI Final Result
भारताचा पराभव

विशाखापट्टणम : मिचेल स्टार्कने ५ बळी घेतले. त्याने 8 षटकात 53 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. त्याचवेळी शॉन एबॉटने 6 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले. नॅथन एलिसने 5 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 31 धावांची भागीदारी केली. याशिवाय अक्षर पटेल हा 29 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. त्याने स्टार्कच्या चेंडूवर सलग दोन षटकारही ठोकले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 16 धावा केल्या.

भारताची प्रथम गोलंदाजी:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 26 षटकांत भारताचा डाव 117 धावांत गुंडाळला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पराभव पत्करला. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.

४ भारतीय फलंदाज शून्यावर बाद: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताच्या खराब फलंदाजीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, या सामन्यात ४ भारतीय फलंदाज शून्यावर बाद झाले आणि ७ फलंदाज दुहेरी आकडाही ओलांडू शकले नाही. टीम इंडियाचे चार फलंदाज शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या सामन्यात आपले खातेही उघडू शकले नाहीत आणि शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी केएल राहुल (9), हार्दिक पांड्या (1) आणि कुलदीप यादव (4) वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

भारताची चौथी सर्वांत कमी धावसंख्या: विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची 117 धावा ही घरच्या मैदानावरील एकदिवसीय क्रिकेटमधील चौथी सर्वांत कमी धावसंख्या आहे. वनडेमध्ये घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाची सर्वांत कमी धावसंख्या 78 आहे जी 1986 मध्ये कानपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध बनवली होती. त्याच वेळी, 1993 मध्ये अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना टीम इंडिया अवघ्या 100 धावांवर संपुष्टात आली होती. 2017 मध्ये धर्मशालामध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टीम इंडियाला केवळ 112 धावा करता आल्या होत्या.

अशी झाली भारतीय टीमची अवस्था: १५:२१- १९ मार्च :भारताची सातवी विकेट पडली. ही विकेट रवींद्र जडेजाच्या रूपाने पडली. रवींद्र जडेजाने 39 चेंडूत 16 धावा केल्या. रवींद्र 19 षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. भारताची धावसंख्या २१ षटकांत ९१/७ राहिली.

15:07- 19 मार्च : भारताची सर्वांत खराब सुरुवात, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा:PSL 2023 Final : लाहोर कलंदर्स पीएसएलचा नवा चॅम्पियन! मुलतानचा अवघ्या एका धावाने पराभव!

ABOUT THE AUTHOR

...view details