महाराष्ट्र

maharashtra

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर भारत; पाहा कशी होते निवड...

By

Published : Jun 18, 2020, 7:51 PM IST

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाच स्थायी सदस्य आहेत. चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम (यामध्ये ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडचाही समावेश आहे) आणि अमेरिका हे ते पाच सदस्य. यातील दहा अस्थायी सदस्यांची निवड ही संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधून केली जाते. दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात येते..

India becomes non-permanent member of UN Security Council
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर भारत; पहा कशी होते निवड...

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे. या परिषदेवर निवड होण्याची ही भारताची आठवी वेळ आहे. १ जानेवारी २०२१पासून पुढील दोन वर्षांसाठी भारत या परिषदेवर असणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, सुरक्षा परिषेदच्या अस्थायी सदस्यांची निवड प्रक्रिया...

कशा प्रकारे होते ही निवडणूक..?

१७ डिसेंबर १९६३च्या सुधारणेनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधील अस्थायी सदस्यांची संख्या ६ वरून १० करण्यात आली. चार्टरच्या अनुच्छेद २३मध्ये ही सुधारणा ३१ ऑगस्ट १९६५पासून लागू करण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाच स्थायी सदस्य आहेत. चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम (यामध्ये ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडचाही समावेश आहे) आणि अमेरिका हे ते पाच सदस्य. तसेच यातील दहा अस्थायी सदस्यांची निवड ही संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधून केली जाते. दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात येते.

निवड प्रक्रियेच्या नियमांमधील १४२व्या नियमानुसार, दरवर्षी पाच अस्थायी सदस्यांची निवड करण्यात येते. १९६३मध्ये झालेल्या अठराव्या सत्रामध्ये या निवडीसाठी एक पॅटर्न लागू करण्यात आला. त्यानुसार अस्थायी सदस्यांपैकी -

  • पाच सदस्य आफ्रिकन आणि आशियाई देशांमधील हवेत.
  • एक सदस्य पूर्व-युरोपियन देशांमधील हवा.
  • लॅटिन अमेरिकन देशांमधून दोन सदस्य हवेत.
  • पश्चिम युरोपीय आणि इतर देशांमधून दोन सदस्य हवेत.

निवड प्रक्रियेच्या नियमांमधील नियम १४४नुसार, ज्या सदस्याचा कार्यकाळ संपणार आहे तो त्वरित पुनर्निवडणुकीसाठी अपात्र ठरतो. तर, नियम ९२नुसार ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही उमेदवारी भरण्यात येत नाही.

यासोबतच, नियम ८३ नुसार दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेल्या सभासदांना सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवडण्यात येते.

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य परिषदेमध्ये भारताची कामगिरी..

वर्ष एकूण मतं भारताची मतं मतांची टक्केवारी तत्कालीन पंतप्रधान
१९५०-५१ ५८ ५६ ९६.५% जवाहरलाल नेहरू
१९६७-६८ ११९ ८२ ६८.९% इंदिरा गांधी
१९७२-७३ ११६ १०७ ९२.२% इंदिरा गांधी
१९७७-७८ १३८ १३२ ९५.६% मोरारजी देसाई
१९८४-८५ १५५ १४२ ९१.६% इंदिरा गांधी
१९९१-९२ १५४ १४१ ९१.५% पी. व्ही. नरसिम्हा राव
२०११-१२ १९१ १८७ ९७.९% मनमोहन सिंग
२०२१-२२ १९२ १८४ ९५.८% नरेंद्र मोदी

पाकिस्तान मात्र भारताच्या निवडीवर नाराज आहे. भारताची संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर निवड झाल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तरीसुद्धा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरेशी यांनी सांगितले, की भारताची अशाप्रकारची निवड होणे ही काही मोठी बाब नाही. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, आमच्यासाठी हा एक चिंतेचा विषय आहे.

हेही वाचा :कोविड-१९ : रुग्णांवर 'डेक्सामेथासॉन'च्या वापराला ब्रिटनने दिली परवानगी..

ABOUT THE AUTHOR

...view details