नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज झाली आहे. न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या हिने खोट्या बातम्या दिल्याचा आरोप केला आहे. याचिकेत आराध्या अल्पवयीन असल्याने अशा प्रकारचे वृत्तांकन थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल : गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने अमिताभ बच्चन यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाचा आणि आवाजाचा वापर करण्यावर अंकुश ठेवला आणि म्हटले की, अमिताभ बच्चन हे सेलिब्रिटी आहेत यावर वाद होऊ शकत नाही. त्याचे नाव आणि आवाज विविध जाहिरातींमध्ये वापरला जातो.
अमिताभ यांची बदनामी होण्याचा धोका : या प्रकरणी आदेश न दिल्यास अमिताभ यांची बदनामी होण्याचा धोका असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. याचिकेच्या आधारे न्यायालयाने अमिताभ यांच्या विनंतीवरून दूरसंचार विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली होती. अमिताभ यांच्यावतीने याचिकेत दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाला इंटरनेट सेवा प्रदात्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचे बेकायदेशीरपणे उल्लंघन करणाऱ्या वेबसाइटच्या लिंक्स आणि सूची काढून टाकण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.