महाराष्ट्र

maharashtra

Ashish Shelar Criticized Mahavikas Aghadi : 'तानाशाही हरली लोकशाही जिंकली', शेलारांची सरकावर टीका

By

Published : Feb 12, 2022, 1:30 PM IST

आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली ( Ashish Shelar Criticized Mahavikas Aghadi ) आहे. तानाशाही हरली लोकशाही जिंकली. राज्य सरकारने आमचे निलंबन रद्द केले नाही, पण आम्ही आमचा अधिकार मिळवला असल्याचेही शेलार यांनी यावेळी म्हटले.

Ashish Shelar
Ashish Shelar

मुंबई - सन्मानीय विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती तुमची मागणी चुकली आहे. विधिमंडळाने जे पत्रकार परिषदेत मांडले ते न्यायालयात मांडले गेले आहे. तानाशाही हरली लोकशाही जिंकली. महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण झालेला निवाड्याचा आपण दाखला देता. आपण ते वाचले असते तर पत्रकार परिषद घेतली नसती, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली ( Ashish Shelar Criticized Mahavikas Aghadi ) आहे.

बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबाबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी न्यायालयाच्या निकालामुळे सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण बाधित झाले आहे. त्यामुळे हा विषय घटनापीठाकडे सोपवावा अशी मागणी केली. त्यावर आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शेलार म्हणाले की, बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आलेचे विधिमंडळाचे सभापती यांनी जाहीर केले. याबद्दल विधानपरिषदेचे सभापती आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांचे आभार मानतो. मात्र, राज्य सरकारने आमचे निलंबन रद्द केले नाही. पण आम्ही आमचा अधिकार मिळवला असल्याचे शेलार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाला नोटील देत आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. मात्र, ते गेले नाही. त्यांनी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार नाही असे म्हटलं. एकीकडे न्यायालयात जायचे नाही आणि दुसरीकडे राष्ट्रपती यांच्याकडे जाऊन मागणी करायची हे योग्य नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय विधानमंडळाच्या कामात हस्तक्षेप करेल, असे वाटत नाही, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा -The Child's Life : कापडासाठी आईने पोटच्या मुलालाच साडीने बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले

ABOUT THE AUTHOR

...view details