महाराष्ट्र

maharashtra

Diary Of West Bengal : 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पोलिसांची नोटीस, राज्याची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

By

Published : May 26, 2023, 7:09 PM IST

पश्चिम बंगाल पोलिसांनी 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना चित्रपटाद्वारे राज्याची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली नोटीस पाठवली आहे. या संदर्भात सनोज यांना 30 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Diary Of West Bengal
डायरी ऑफ वेस्ट बंगाल

कोलकाता : देशात 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरून वाद सुरु असतानाच आता 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या आगामी हिंदी चित्रपटाने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. या चित्रपटाद्वारे पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत कोलकाता पोलिसांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना समन्स बजावला आहे. त्यांना 30 मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, बंगालचा अपमान करण्याचा आपला हेतू नसल्याचा दिग्दर्शकाचा दावा आहे. सखोल संशोधन करून खरे सत्य या चित्रपटात मांडण्यात आल्याचा दावा सनोज मिश्रा यांनी केला आहे.

पुराव्यांच्या आधारे चित्रपट बनवल्याचा दिग्दर्शकांचा दावा : ते म्हणाले की, 2 वर्षांपूर्वी त्यांनी बंगालच्या समस्यांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांचा दावा आहे की त्यांनी चित्रपटात, बंगालची समाजव्यवस्था कशी कोलमडली आहे, बेरोजगारी कशी वाढत आहे, हे दाखवले आहे. बंगालमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हे सर्व घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सर्व माहिती आणि पुराव्यांच्या आधारे हा चित्रपट बनवल्याचा दावा सनोज मिश्रा यांनी केला आहे.

30 मे ठाण्यात हजर राहण्याचे आदेश : या चित्रपटाचा ट्रेलर 8 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. जितेंद्र नारायण सिंह त्यागी निर्मित या चित्रपटात पश्चिम बंगालची प्रतिमा खराब केल्याबद्दल पोलिसांनी दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना CrPC च्या कलम 41 (A) अंतर्गत नोटीस बजावली आहे. त्यांना 30 मे रोजी एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

काय आहे चित्रपटात? : चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास अडीच लाख प्रेक्षकांनी तो पाहिला आहे. ट्रेलरमध्ये म्हटले आहे की, स्वातंत्र्यापूर्वी पश्चिम बंगाल हा भारताची शान होती, पण सध्या हा प्रांत तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे जळत आहे. राज्यात व्होट बँक बघून अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य दिले जात आहे. बंगाल आता दुसरे काश्मीर बनले आहे, असा दावाही ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. रोहिंग्या आणि एनआरसीसारखे वादग्रस्त विषयही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. SC to watch The Kerala Story : याचिकेवर सुनावणीपूर्वी द केरळ स्टोरी पाहण्याची सर्वोच्च न्यायालयाची इच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details