महाराष्ट्र

maharashtra

ज्ञानवापी मशीद प्रकरण! काय आहे इतिहास; पहा ETV Bharat'चा खास रिपोर्ट

By

Published : May 12, 2022, 1:35 PM IST

Updated : May 15, 2022, 2:40 PM IST

ज्ञानवापी मशीद

सन 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाराणसीच्या पाच महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात शृंगार गौरी मंदिरात दररोज दर्शन आणि पूजा करण्याच्या मागणीसाठी दावा दाखल केला होता. ( Gyanvapi Masjid and Shringar Gauri case ) जो न्यायालयाने मान्य करत, परिस्थिती जाणून घेण्यासाठी वकिलांचा एक आयोग नेमण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या या प्रकरणाची देशभर चर्चा आहे. यावर न्यायालयायाचाही निर्णय येत आहे.

वाराणसी (उत्तर प्रदेश) -ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय, कोर्ट कमिशनर हटणार नाहीतवाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

शृंगार गौरीच्या श्री काशी विश्वनाथ ज्ञानवापी संकुलात नियमित दर्शन होत असल्याप्रकरणी अधिवक्ता आयुक्त बदलण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली होती. ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी सर्वेक्षण प्रकरणात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय राखून ठेवला. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवीकुमार दिवाकर यांनी पुढील सुनावणीसाठी आज गुरुवार (12 मे) ही तारीख निश्चित केली. याप्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे ज्ञानवापी मस्जिद अन् श्रृंगार गौरी प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊ -

ज्ञानवापी मशीदचा इतिहास याबाबत ईटीव्ही भारतशी संवाद


काय आहे ज्ञानवापी मशीद -ज्ञानवापी मशीद औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली असा दावा अनेकांनी केला आहे. हा मंदिर-मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून (213) वर्षांपूर्वी त्यावरून दंगली झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या मुद्द्यावरून दंगल झाली नाही. ( Gyanvapi Masjid ) अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर (1991) मध्ये ज्ञानवापी हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली पहिली याचिका दाखल करण्यात आली होती.

धर्म दिन-ए-इलाही - 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग तोडून ज्ञानवापी मशीद बांधली असे मानले जाते. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की 14 व्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानने मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती. (Gyanvapi Masjid case) तर काहींच्या मते, विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद अकबराने 1585 मध्ये नवीन धर्म दिन-ए-इलाही अंतर्गत बांधली होती.


मशीद आणि विश्वनाथ मंदिरादरम्यान 10 फूट खोल विहीर आहे, तिला ज्ञानवापी म्हणतात. या विहिरीवरून मशिदीचे नाव ज्ञानवापी पडले. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाने स्वतः आपल्या त्रिशूलाने ही विहीर लिंगाभिषेकासाठी बनवली होती. येथेच शिवाने पत्नी पार्वतीला ज्ञान दिले, म्हणून या स्थानाचे नाव ज्ञानवापी किंवा ज्ञानाची विहीर पडले. ही विहीर थेट पौराणिक काळातील दंतकथा, सामान्य लोकांच्या श्रद्धा यांच्याशी संबंधित आहे.


एक टॉवर कोसळला होता - ज्ञानवापी मशीद हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण आहे. मशिदीच्या घुमटाखाली मंदिरासारखी भिंत दिसते. औरंगजेबाने पाडलेल्या विश्वनाथ मंदिराचा हा भाग असल्याचे मानले जाते. ज्ञानवापी मशिदीचे प्रवेशद्वारही ताजमहालप्रमाणेच बनवले आहे. मशिदीला तीन घुमट आहेत, जे मुघल छाप सोडतात. मशिदीचे मुख्य आकर्षण म्हणजे गंगा नदीच्या वरचे 71 मीटर उंच मिनार. 1948 मध्ये आलेल्या पुरामुळे ज्ञानवापी मशिदीचा एक टॉवर कोसळला होता.


1669 मध्ये औरंगजेबाने ती तोडून मशीद बांधली - मंदिर-मशीद संदर्भात अनेक वाद झाले आहेत, पण हे वाद स्वातंत्र्यापूर्वीपासून आहेत. 1809 मध्ये, जेव्हा हिंदूंनी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यामध्ये एक लहान जागा बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे भीषण दंगली झाल्या. 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे की, मूळ मंदिर 2050 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधले होते. 1669 मध्ये औरंगजेबाने ती तोडून मशीद बांधली.


पूजास्थळ कायदा 1991 लागू होत नाही - मंदिराचे अवशेष मशिदीमध्ये वापरण्यात आले होते, त्यामुळे ही जमीन हिंदू समाजाला परत देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार, मंदिराच्या अवशेषांवरून मशीद बांधण्यात आल्याने या प्रकरणात पूजास्थळ कायदा 1991 लागू होत नाही. 1998 मध्ये, ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणारी समिती अंजमुन इनझानिया यांनी याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. समितीने म्हटले आहे की, या वादात कोणताही निर्णय घेता येणार नाही, कारण याला प्रार्थनास्थळे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली.

सर्वेक्षण करण्याच्या याचिकेला विरोध केला - 2019 मध्ये, विजय शंकर रस्तोगी यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्यासाठी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी न्यायालयात 2019 मध्ये पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. 2020 मध्ये, अंजुमन इनजतियाने पुरातत्व सर्वेक्षण करण्याच्या याचिकेला विरोध केला. त्याच वर्षी रस्तोगी यांनी उच्च न्यायालयाने स्थगिती न वाढवण्याचे कारण देत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.


जगाचा स्वामी - काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर आहे. वाराणसीला बनारस असेही म्हणतात, त्याचे प्राचीन नाव काशी होते. म्हणूनच विश्वनाथ मंदिराला काशी विश्वनाथ मंदिर असेही म्हणतात. येथे शिवाला विश्वनाथ म्हणजेच 'विश्वाचा स्वामी' किंवा विश्वेश्वर म्हणजेच 'जगाचा स्वामी' म्हणून पूजले जाते.


उत्तर प्रदेश सरकारकडे व्यवस्थापन - काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो. मूळ विश्वनाथ मंदिर 1194 मध्ये मुहम्मद घोरीच्या सेनापती कुतुबुद्दीन ऐबकने पाडले होते. हे मंदिर 1230 मध्ये गुजरातमधील एका व्यापाऱ्याने पुन्हा बांधले असे मानले जाते. 1447-1458 दरम्यान हुसेन शाह शरीकी किंवा 1489-1517 च्या दरम्यान सिकंदर लोदी यांनी मंदिर पुन्हा पाडले. काही मान्यतेनुसार, 1585 मध्ये अकबराचा मंत्री तोडरमल याने विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. विश्वनाथ मंदिराचे सध्याचे स्वरूप 1780 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. उत्तर प्रदेश सरकार 1983 पासून या मंदिराचे व्यवस्थापन करत आहे.


मंदिर आणि ज्ञानवापी मस्जिद - काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीच्या विश्वनाथ गलीमध्ये गंगा नदीच्या काठावर आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मस्जिद एकमेकांना लागून आहेत, पण इथून येण्याचे मार्ग वेगळे आहेत. मंदिराचे मुख्य शिवलिंग 60 सेमी लांब आणि 90 सेमी परिघाचे आहे. मुख्य मंदिराभोवती काल-भैरव, कार्तिकेय, विष्णू, गणेश, पार्वती आणि शनी यांची छोटी मंदिरे आहेत.


विहिरीत दडले होते - मंदिरात 3 सोन्याचे घुमट आहेत, जे पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी 1839 मध्ये स्थापित केले होते. मंदिर-मशीद यांच्या मध्ये एक विहीर आहे, तिला ज्ञानवापी विहीर म्हणतात. स्कंद पुराणातही ज्ञानवापी विहिरीचा उल्लेख आहे. मुघलांच्या आक्रमणावेळी हे शिवलिंग ज्ञानवापी विहिरीत दडले होते असे सांगितले जाते.


ज्ञानवापी विहिरीत दडले - मंदिरात 3 सोन्याचे घुमट आहेत, जे पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी 1839 मध्ये स्थापित केले होते. मंदिर-मशीद यांच्या मध्ये एक विहीर आहे, तिला ज्ञानवापी विहीर म्हणतात. स्कंद पुराणातही ज्ञानवापी विहिरीचा उल्लेख आहे. मुघलांच्या आक्रमणावेळी हे शिवलिंग ज्ञानवापी विहिरीत दडले होते असे सांगितले जाते.

सध्या येथे वर्षातून एकदाच पूजा होते - ज्ञानवापी मस्जिद परिसरात शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेचा ताजा वाद आहे. (18 ऑगस्ट 2021)रोजी, 5 महिला ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कोर्टात पोहोचल्या होत्या, त्यांनी माँ शृंगार गौरी, गणेश जी, हनुमानजी आणि परिसरात उपस्थित असलेल्या इतर देवतांच्या दैनंदिन पूजेची परवानगी मागितली होती. सध्या येथे वर्षातून एकदाच पूजा होते.


पडताळणीसाठी व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे आदेश - या पाच याचिकाकर्त्यांचे नेतृत्व दिल्लीतील राखी सिंग करत आहेत, उर्वरित चार महिला सीता साहू, मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि बनारसच्या रेखा पाठक आहेत. (26 एप्रिल 2022)रोजी वाराणसी सिव्हिल कोर्टाने ज्ञानवापी मशीद संकुलातील शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या पडताळणीसाठी व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.


परिसराचे सर्वेक्षण करणे आवश्यक - न्यायालयाच्या आदेशानंतरही मुस्लीम पक्षाच्या प्रचंड विरोधामुळे येथे ६ मेपासून सुरू झालेले तीन दिवसीय सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 10 मे रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली होती. या मुस्लीम पक्ष सर्वेक्षणासाठी मशिदीच्या आत जाणे चुकीचे सांगत आहे. शृंगार देवीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे.

---------------------------------------------

आताचे प्रकरण - काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याच परिसरात असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण वाराणसीच्या स्थानिक न्यायालयात 1991 पासून सुरू असताना आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे. पण माता शृंगार गौरी मंदिराचे प्रकरण फक्त सात महिने जुने आहे.

न्यायालयीन आयुक्त बॅकफूटवर - १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाराणसीच्या पाच महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात शृंगार गौरी मंदिरात दररोज दर्शन आणि पूजा करण्याच्या मागणीसाठी दावा दाखल केला होता. जो न्यायालयाने मान्य करत, परिस्थिती जाणून घेण्यासाठी वकिलांचा एक आयोग नेमण्याचा आदेश दिला होता. विरोधकांना नोटिसा बजावण्याबरोबरच पुढील सुनावणीही निश्चित करण्यात आली, मात्र दोन-दोन वेळा न्यायालयीन आयुक्त बॅकफूटवर गेल्याने वादग्रस्त जागेची पाहणी होऊ शकले नाही.

व्हिडिओग्राफीची कारवाई - वाराणसीचे दिवाणी न्यायालयाचे सीनियर डिव्हिजन फास्ट ट्रॅकचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी १८ ऑगस्टच्या त्यांच्या जुन्या आदेशाचा पुनरुच्चार करत, ८ एप्रिल रोजी न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती केली आणि पुन्हा व्हिडिओग्राफी कारवाईला परवानगी दिली होती. यानंतर, प्रतिवादींपैकी, वाराणसी जिल्हा प्रशासन आणि आयुक्तालय पोलिसांनी आक्षेप नोंदवताना, कारवाई थांबवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि मशिदीत मुस्लिामांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनाच आत जाण्याचा युक्तीवाद केला होता. त्यावर सुनावणीअंती युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने आपल्या जुन्याच आदेशाला कायम ठेवत ईदनंतर व्हिडिओग्राफीची कारवाई करून अहवाल मागवला.

मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा - सन 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाची पहिली ठिणगी पडली. वाराणसी येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये वाराणसी शहरामधील चौक परिसरात असणारी ज्ञानवापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं, मुघल बादशाह औरंगजेबने आपल्या कार्यकाळामध्ये हे मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका वाराणसीच्या विजय शंकर रस्तोगी यांनी दाखल केली होती.

हेही वाचा -Asani Cyclone : 'असानी' चक्रीवादळ आंध्र प्रदेशात पोहोचले.. अनेक ठिकाणी पिके भुईसपाट..

Last Updated :May 15, 2022, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details