अयोध्या : दीपावलीचा सण संपूर्ण देशात अनेक शतकांपासून साजरा केला जात आहे. दिवाळीचा सण का साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. दिवाळीनिमित्त देशभरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. दिव्यांचा हा सण मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी लोक बाजारपेठेत खरेदी करत आहेत. पण या उत्सवाच्या उगमस्थानी दीपोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या टीमने केला आहे. अयोध्येतील संतांच्या दृष्टीने दीपावलीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, हे अयोध्येतील संतांनी सांगितले. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि भाविक अयोध्येत दाखल
धार्मिक नगरी अयोध्येत दीपावलीची परंपरा त्रेता युगापासून सुरू झाली. अयोध्येतील शरयू तीरापासून ते राम की पैडी संकुलापर्यंत दीपोत्सव कार्यक्रमाची छटा पसरली आहे. प्रत्येकजण या उत्सवाबद्दल उत्सुक आहे आणि या भव्य कार्यक्रमाचा भाग बनू इच्छितो. संध्याकाळी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जमणारी गर्दी हे या दीपोत्सवाबाबत अयोध्येतील लोकांमध्ये असलेल्या उत्साहाचे प्रतिक आहे. केवळ अयोध्याच नाही तर भारतातील इतर राज्यांतील पर्यटक आणि भाविकही दीपोत्सवाचे महत्त्व अधिक जवळून समजून घेण्यासाठी राम नगरी पोहोचले आहेत.अशा परिस्थितीत अयोध्येच्या दृष्टीकोनातून दीपावलीचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण जगात रामराज्य स्थापनेचा स्मरणदिन
दीपोत्सवाच्या परंपरेचे पौराणिक महत्त्व अयोध्येशीच जोडलेले आहे. तिवारी मंदिराचे महंत गिरीश पती त्रिपाठी यांनी सांगितले की, 'जेहि दिन राम जनम श्रुति गावहिं। तीरथ सकल तहाँ चलि आवहिं'. म्हणजे ज्या दिवशी रामाचा अयोध्येत जन्म झाला, त्या दिवशी सर्व तीर्थ अयोध्येत येतात. त्याचप्रमाणे 'अवधपुरी प्रभु आवत जानी। भई सकल सोभा कै खानी' म्हणजे जेव्हा रामाने रावणाचा वध करून लंका जिंकली आणि अयोध्येला परतले, त्या वेळी अयोध्येत रामाचे राज्य स्थापन झाले.