महाराष्ट्र

maharashtra

जाणून घ्या, दीपावलीचा सण अयोध्येसाठी किती खास आहे!

By

Published : Nov 3, 2021, 1:51 PM IST

अयोध्येतील शरयू किनार्‍यापासून राम की पैडी संकुलापर्यंत दीपोत्सव कार्यक्रमाची छटा पसरली आहे. प्रत्येकजण या उत्सवाबद्दल उत्सुक आहे आणि या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक आहे. संध्याकाळी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जमणारी गर्दी हे या दीपोत्सवाबाबत अयोध्येतील लोकांमध्ये असलेल्या उत्साहाचे प्रतिक आहे. केवळ अयोध्याच नाही तर भारतातील इतर राज्यांतील पर्यटक आणि भाविकही दीपोत्सवाचे महत्त्व अधिक जवळून समजून घेण्यासाठी राम नगरी पोहोचले आहेत.

जाणून घ्या, दीपावलीचा सण अयोध्येसाठी किती खास आहे!
जाणून घ्या, दीपावलीचा सण अयोध्येसाठी किती खास आहे!

अयोध्या : दीपावलीचा सण संपूर्ण देशात अनेक शतकांपासून साजरा केला जात आहे. दिवाळीचा सण का साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. दिवाळीनिमित्त देशभरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. दिव्यांचा हा सण मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी लोक बाजारपेठेत खरेदी करत आहेत. पण या उत्सवाच्या उगमस्थानी दीपोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या टीमने केला आहे. अयोध्येतील संतांच्या दृष्टीने दीपावलीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, हे अयोध्येतील संतांनी सांगितले. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...

जाणून घ्या, दीपावलीचा सण अयोध्येसाठी किती खास आहे!

कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि भाविक अयोध्येत दाखल

धार्मिक नगरी अयोध्येत दीपावलीची परंपरा त्रेता युगापासून सुरू झाली. अयोध्येतील शरयू तीरापासून ते राम की पैडी संकुलापर्यंत दीपोत्सव कार्यक्रमाची छटा पसरली आहे. प्रत्येकजण या उत्सवाबद्दल उत्सुक आहे आणि या भव्य कार्यक्रमाचा भाग बनू इच्छितो. संध्याकाळी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जमणारी गर्दी हे या दीपोत्सवाबाबत अयोध्येतील लोकांमध्ये असलेल्या उत्साहाचे प्रतिक आहे. केवळ अयोध्याच नाही तर भारतातील इतर राज्यांतील पर्यटक आणि भाविकही दीपोत्सवाचे महत्त्व अधिक जवळून समजून घेण्यासाठी राम नगरी पोहोचले आहेत.अशा परिस्थितीत अयोध्येच्या दृष्टीकोनातून दीपावलीचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

संपूर्ण जगात रामराज्य स्थापनेचा स्मरणदिन

दीपोत्सवाच्या परंपरेचे पौराणिक महत्त्व अयोध्येशीच जोडलेले आहे. तिवारी मंदिराचे महंत गिरीश पती त्रिपाठी यांनी सांगितले की, 'जेहि दिन राम जनम श्रुति गावहिं। तीरथ सकल तहाँ चलि आवहिं'. म्हणजे ज्या दिवशी रामाचा अयोध्येत जन्म झाला, त्या दिवशी सर्व तीर्थ अयोध्येत येतात. त्याचप्रमाणे 'अवधपुरी प्रभु आवत जानी। भई सकल सोभा कै खानी' म्हणजे जेव्हा रामाने रावणाचा वध करून लंका जिंकली आणि अयोध्येला परतले, त्या वेळी अयोध्येत रामाचे राज्य स्थापन झाले.

सर्व नर नारी आनंदाने डोलत होते आणि प्रभू राम अयोध्येला आल्यावर दिव्यांची श्रृंखला तयार करण्यात आली होती. याच्या आठवणी कलियुगापर्यंत कायम आहेत. त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी दीपावली आणि दीपोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे दीपोत्सवाची परंपरा अयोध्येसाठी नवीन नसून तिचे उगम आहे.

अयोध्येतील लोकांसाठी दीपोत्सव हे महापर्व

तसे पाहता, अयोध्येतील लोक शतकानुशतके देशातील इतर राज्ये आणि शहरांप्रमाणे दिवाळीचा सण साजरा करत आहेत. पण गेल्या 4 वर्षांत अयोध्येत जे आयोजन झाले आहे, त्यामुळे दीपावलीचा सण किती महत्त्वाचा आहे, हे अयोध्येतील लोकांना कळाले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी होत आहे.

दरवर्षी दीपोत्सव कार्यक्रमाची भव्यता वाढत आहे

राम नगरी अयोध्येच्या सरयू तीरावर होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची देशभर चर्चा आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला अधिक भव्यता दिली जात आहे. येत्या काळात या कार्यक्रमाची भव्यता पाहता अयोध्येत पर्यटनाच्या अमर्याद शक्यता निर्माण होणार हे उघड आहे. त्यामुळे जगभरात अयोध्येचा गौरव तर होईलच, पण अयोध्येतील लोकांना रोजगारही मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details