महाराष्ट्र

maharashtra

Indo US Partnership : भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा संरक्षण सर्वात महत्त्वाचा स्तंभ - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 3:07 PM IST

Indo US Partnership : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण हा भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ असल्याचं सांगितलंय. त्यांनी भारत-अमेरिका भागीदारी मुक्त आणि नियम आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचंही सांगितलंय.

Indo US Partnership
Indo US Partnership

नवी दिल्ली Indo US Partnership : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारत-अमेरिका 'टू प्लस टू' चर्चेत संबोधित करताना, संरक्षण हा द्विपक्षीय संबंधांच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक असल्याची घोषणा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन 'टू प्लस टू' चर्चेसाठी दिल्लीत आले आहेत. संरक्षण सहकार्यासाठी भारत-अमेरिकेचा भविष्यातील रोडमॅप पुढे नेणे हा संभाषणाचा उद्देश आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह : 'टू प्लस टू' परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय संवादाच्या पाचव्या आवृत्तीला संबोधित करताना ते म्हणाले की, तुमची भारत भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका पूर्वीपेक्षा जवळ आले आहेत. विविध उदयोन्मुख भौगोलिक राजकीय आव्हानं असूनही, आपल्याला महत्त्वाच्या आणि दीर्घकालीन समस्यांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. मुक्त आणि नियम बद्ध इंडो पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी आमची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे.

अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा : या चर्चेतील भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करणार आहेत. 'टू प्लस टू' आणि राजनाथ सिंह-ऑस्टिन यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत सामरिक, संरक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय. अमेरिकेचे संरक्षण सचिव, लॉयड ऑस्टिन यांनी सांगितलं की, भारत आणि अमेरिकेनं गेल्या वर्षभरात संरक्षण भागीदारी उभारण्यात 'प्रभावी प्रगती' केलीय. तातडीच्या जागतिक आव्हानांना तोंड देत भारत आणि अमेरिका यांनी विचारांची देवाणघेवाण करणे, समान उद्दिष्टे शोधणे आणि दोन्ही देशांतील लोकांसाठी काम करणे याला महत्त्वाचं म्हटलंय.

ऑस्टिन काय म्हणाले : भारत-अमेरिका टू प्लस टू मंत्रिस्तरीय संवादाच्या सुरुवातीच्या भाषणात, ऑस्टिन म्हणाले की आम्ही मोठ्या गतीच्या वेळी भेटत आहोत. यूएस-भारत भागीदारी तातडीच्या जागतिक आव्हानांना तोंड देत असताना, जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहीने विचारांची देवाणघेवाण करणे, समान उद्दिष्टे शोधणे आणि त्यांच्या लोकांसाठी कार्य करणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :

  1. India China Tawang Clash: तवांग चकमकीवर संरक्षण मंत्री म्हणाले, 'ना आमचा जवान शहीद झाला, ना गंभीर जखमी'
  2. Qatar Indian Navy Veterans : कतारमध्ये शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची जयशंकर यांनी घेतली भेट, केलं मोठं वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details