नवी दिल्ली -तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे सोडले आहे. तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते.
तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना व्हेरिफिकेशन आणि प्रवासाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली होती. त्यांना अज्ञात ठिकाणी नेले होते. त्यामुळे भारतामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतीयांना कोणताही हानी नसल्याचे सुत्राने सांगितले. अफगाणिस्तानमधील माध्यमाच्या माहितीनुसार 150 भारतीय हे काबुल विमानतळाच्या दिशेने जात होते. त्यांना तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर भारतीयांची सुटका करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे नागरिक काबुल विमानतळाच्या दिशेने जात असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुमारे 80 भारतीयांना शनिवारी काबुलमधून नेले आहे. हे विमान ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथील विमानतळावर उतरविण्यात आले आहे. नवी दिल्लीजवळील हिनदोन या धावपट्टीवर हे विमान सायंकाळी पोहोचणार आहे.
हेही वाचा-अदानी ग्रुपला झटका, 4500 कोटींच्या आयपीओला सेबीकडून तात्पुरती स्थगित