महाराष्ट्र

maharashtra

India Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीर खाली करा, दहशतवाद आवरा ; संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानला सुनावलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 11:14 AM IST

India Slams Pakistan : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारतावर काश्मीर प्रकरणी टीका केली होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले.

India Slams Pakistan
सचिव पेटल गेहलोत

न्यूयॉर्क India Slams Pakistan : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताविरोधात अनेक आरोप केले होते. मात्र त्यांच्या आरोपांना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर खाली करा, दहशतवादाला आवरा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक नागरिकांवर होणारे अन्याय थांबवा, असा हल्लाबोल भारतानं केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर हा हल्लाबोल केला आहे.

पाकिस्ताननं काश्मीरवरील अनाधिकृत ताबा सोडावा :UNGA समितीच्या बैठकीत पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी काश्मीरचा राग आळवला होता. त्यावर संयुक्त राष्ट्र संघातील सचिव पेटल गेहलोत यांनी भारताच्या वतीनं उत्तर देण्याचा अधिकार वापरला. यावेळी पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला चांगलचं फटकारलं. पाकिस्ताननं भारताच्या भूमीवर अनाधिकृतपणानं ताबा मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अगोदर पाकव्याप्त काश्मीर खाली करावा, असं पेटल गेहलोत यांनी यावेळी सुनावलं. पाकिस्ताननं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवावा आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर आवर घालावा, असे खडे बोल भारतानं पाकिस्तानला सुनावले आहेत.

पाकिस्तानला भाष्य करण्याचा अधिकार नाही :जम्मू-काश्मीर आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणं हा भारताच्या अंतर्गत बाबींचा विषय आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचं पेटल गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलं. जगातील सगळ्यात जास्त मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानात होतात. अल्पसंख्यांक महिलांची पाकिस्तानात मोठी दयनिय अवस्था आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अगोदर आपलं घर संभाळावं, असंही पेटल गेहलोत यांनी यावेळी बजावलं आहे. पाकिस्ताननं राजकीय भावनेनं प्रेरित होऊन जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केला आहे. हा एक प्रकारचा गुन्हा असल्याचंही पेटल गेहलोत यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. Indus Waters Treaty : सिंधू जल करार; भारत पाकिस्तान तटस्थ लवादाच्या बैठकीत सहभागी, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
  2. Shiv Sena Burnt Pakistan Flag : भारतीय जवानांवरील हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध, पाकिस्तानचा झेंडा जाळला

ABOUT THE AUTHOR

...view details