महाराष्ट्र

maharashtra

नव संकल्प शिबिराची आज सांगता; काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब?

By

Published : May 15, 2022, 7:55 AM IST

Updated : May 15, 2022, 12:26 PM IST

नव संकल्प शिबिराची आज सांगता

राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या नव संकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाने स्थापन केलेल्या समित्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ( Congress Nav sankalp shivir ) नव संकल्प शिबिराची आज रविवार दि. 15 मे'रोजी सांगता होत आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी हे बोलणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उदयपुर (राजस्थान) - तीन दिवसीय नवसंकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी काँग्रेस पक्षाने विविध मुद्द्यांवर विचारमंथन आणि चिंतन केले. ( Congress Nav sankalp shivir ) यावेळी विविध समित्यांच्या सदस्यांनी नवसंकल्पादरम्यान उपस्थित होत असलेले मुद्दे माध्यमांसमोर ठेवले. रविवारी नव संकल्प शिबिराच्या शेवटच्या दिवशी राजकीय मुद्यावर स्थापन झालेल्या समितीचे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.


यानंतर, सर्व 6 प्रस्तावांच्या विचारमंथनाचा अहवाल सीडब्ल्यूसीच्या बैठकीत मंजूर केला जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांचे भाषण होईल. ( All India Congress Chintan Shivir ) त्यानंतर, सोनिया गांधींच्या भाषणानंतर, दुपारी 4:15 वाजता पीसीसी प्रमुखांच्या आभार प्रदर्शनाने शिबिराचा समारोप होईल. काँग्रेस पक्षाच्या या नव संकल्प शिबिरात राहुल गांधींना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याच्या चर्चाही शिगेला पोहोचल्या. आता सर्वांचे लक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पत्त्यांकडे लागले आहे. कारण या दोन्ही नेत्यांचे पत्तेच पक्षाच्या आगामी दिवसांची दिशा आणि दशा ठरवतील.


काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते मीडियासमोर आले. कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची स्थिती बदलणे, एमएसपी हमी कायदा करणे यासारख्या प्रस्तावांवर चर्चा झाल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. ( All India Congress ) काँग्रेसचे युवा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मीडिया सेंटरच्या बाहेर पोहोचले. पत्रकारांनी त्यांच्याशी नवसंकल्प शिबिरावर चर्चा केली, यावेळी पायलट म्हणाले की, पक्षाने मला खूप काही दिले आहे, आगामी काळात पक्ष जी काही जबाबदारी देईल ती मी पूर्ण करेन.

पायलटनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोतही मीडिया सेंटरमध्ये पोहोचले. जिथे पत्रकारांशी चहापानावर चर्चा करताना केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष पुन्हा संकल्प घेऊन जनतेत जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत मोठ्या आत्मविश्वासात दिसले, त्यांनी विजयाची निशाणी दाखवत अनेक प्रश्न भविष्याच्या गर्भात सोडले.

या चिंतन शिबिरात डिस्कससाठी तयार करण्यात आलेल्या शिबिरात सहाही समित्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या समित्यांमध्ये राजकीय, आर्थिक, कृषी, युवा घडामोडी, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक बाबींचा समावेश होता. या सहाही प्रमुखांनी आपापल्या चर्चेत ज्या मुद्यांवर एकमत केले आहे. त्यांचा अहवाल तयार करून उद्या सकाळी CWC समोर ठेवला जाईल.

हेही वाचा -Andrew Symonds Dies : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Last Updated :May 15, 2022, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details