महाराष्ट्र

maharashtra

CM Ashok Gehlot : भाजपचा अजेंडा हिंदुत्वाचा, त्यामुळे देशात दंगली; गेहलोत यांचा भाजपावर निशाणा

By

Published : May 16, 2022, 1:18 PM IST

भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधताना राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले ( Gehlot targets BJP and RSS over riots ) की, भाजपचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामुळे ते दंगली घडवत आहेत. ते म्हणाले की, दंगलीचे जे आरोपी पकडले जात आहेत, ते सर्व भाजप आणि आरएसएसच्या पार्श्वभूमीचे आहेत, इटलीचे नाही. ( CM Ashok Gehlot targets BJP and RSS )

CM Ashok Gehlot
गेहलोत यांचा भाजपावर निशाणा

जयपूर ( राजस्थान ) - नुकतेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या दंगलीवरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला ( CM Ashok Gehlot targets BJP and RSS ) आहे. सीएम गेहलोत म्हणाले की, जिथे जिथे दंगली होत आहेत, त्याचा फायदा भाजपला होत आहे. दंगलीचा फायदा ज्या पक्षाला होत आहे, त्याच पक्षाकडून दंगली घडवून आणल्या जातात, हे समजून घ्या. दंगलीचे जे आरोपी पकडले गेले, ते सर्व भाजप आणि आरएसएसच्या पार्श्वभूमीचे ( Gehlot targets BJP and RSS over riots ) आहेत, इटलीचे नाही.

युपीत 403 तिकिटांपैकी अल्पसंख्याकांना एकही तिकीट नाही - सीएम अशोक गेहलोत म्हणाले की, दंगलीचा काँग्रेसला काहीही फायदा होत नाही. जिथे जिथे दंगली होत आहेत तिथे ते काँग्रेसची बदनामी करत आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. काँग्रेस दंगली का घडवणार? गेहलोत म्हणाले की, भाजपचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामुळे ते दंगली घडवत आहेत. निवडणुकांचे ध्रुवीकरण होत आहे. ते म्हणाले की उत्तर प्रदेशबद्दल जगाला काय वाटेल की भाजप निवडणुकीच्या 403 तिकिटांपैकी अल्पसंख्याकांना एकही तिकीट देत नाही. जगाला काय संदेश जाणार आहे?

हिंदुत्वाच्या नावावर असे राजकारण किती दिवस? -गेहलोत म्हणाले की, जेव्हा जगात चर्चा झाली असती, तेव्हा त्यात त्याचा उल्लेख नक्कीच झाला असता. उत्तर प्रदेशात भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे आणि तेथील 403 विधानसभेच्या जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्याकांना तिकीट दिले गेले नाही. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भाजप हिंदुत्वाच्या मतांसाठी देशाचे विभाजन करत आहे. हिंदुत्वाच्या नावावर असे राजकारण किती दिवस करणार.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया

महागाई आणि रोजगारावर चर्चा नाही - गेहलोत म्हणाले की, महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. याचा विचार कोणी करत नाही. देशात तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. दोन कोटी नोकऱ्या देण्याची चर्चा झाली, पण वाढत्या बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. गेहलोत म्हणाले की, संविधानाने लोकशाही देश चालवते आणि आज संविधानाची पायमल्ली केली जात आहे.

हेही वाचा -Gyanvapi Masjid Survey : ज्ञानव्यापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा, सर्वेक्षण पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details