महाराष्ट्र

maharashtra

KS Bhagwan : भगवान राम सीतेसोबत बसून मद्य प्यायचे, निवृत्त प्राध्यापकाच्या विधानाने खळबळ

By

Published : Jan 22, 2023, 10:45 PM IST

KS Bhagwan

तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचले तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी ११ हजार वर्षं राज्य केले नाही तर, त्यांनी फक्त ११ वर्षं राज्य केले होते. तसेच, भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे असा खळबळजनक दावा निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखक के. एस. भगवान यांनी केला आहे. ते बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

बंगळुरु (कर्नाटक) : देशभरात वारंवार पाहायला मिळते कुणी व्यक्ती काहीतरी व्यक्तव्य करतात आणि देशभर वातावरण चिघळलेले असते. यामध्ये कपड्यांपासून ते रंगापर्यंत हा वाद कायम सुरू असतो. असाच प्रकार आता समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही वरीष्ठ पदावर बसलेल्या नेतेमंडळींकडून इतिहासातील महान व्यक्तिमत्वांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचे आपण पाहिले आहेच. या विधानांवरून मोठा वादही निर्माण झाल्याचं दिसून आले आले. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याविषयी केलेलं विधानाची जोरदार चर्चा आहे. भगवान यांनी आपल्या विधानाला वाल्मिकी रामायणातला संदर्भ दिल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वक्तव्याने सर्वत्र चर्चा : भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवले. तिच्याबद्दल कोणताही विचार त्यांनी केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या सूद्र व्यक्तीचे मुंडके धडावेगळे केले होते. त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतील? असा सवालही भगवान यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

शेवटचा भाग वाल्मिकींनी लिहिलाच नव्हता : या अगोदरही असे केले होते असे विधान : प्राध्याक भगवान यांनी चार वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचं विधान केले होते. ते विधान नव्याने चर्चेत आले होते. त्यावेळीही त्यांनी वाल्मिकी रामायणमधील उत्तरतकांड भागाचा संदर्भ दिला होता. मात्र, वाल्मिकी रामायणाचा उत्तरकांड हा शेवटचा भाग वाल्मिकींनी लिहिलाच नव्हता, तो नंतर त्यात समाविष्ट करण्यात आला, असा दावा त्यावर केला जातो. दरम्यान, भगवान यांनी अता पुन्हा एकदा असे विधान केल्यामुळे वातावरण पुन्हा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :भारत जोडो यात्रेवरून राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details