महाराष्ट्र

maharashtra

Ashish Mishra Bail Canceled : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द

By

Published : Apr 18, 2022, 10:56 AM IST

Updated : Apr 18, 2022, 11:08 AM IST

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवार (दि.18 एप्रिल)रोजी रद्द केला आहे. (Ashish Mishra Bail Canceled) तसेच, सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्रा यांना येत्या आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.

आशिष मिश्रा
आशिष मिश्रा

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. आणि त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. आशिष मिश्रा यांना जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (४ एप्रिल)रोजी निर्णय राखून ठेवला होता. ( Ashish Mishra Bail Cancelled ) सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. खटला सुरू व्हायचा असताना अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल सुनावला.

गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते - 10 मार्च रोजी मुख्य साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी साक्षीदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. ( Ashish Mishra Bail Cancelled by SC ) गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागात शेतकरी निदर्शने करत असताना उसळलेल्या हिंसाचारात लखीमपूर खेरी येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले, ज्यामध्ये आशिष मिश्रा बसले होते.

काय आहे प्रकरण -उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला.

रविवरी नेमकं काय घडल? -रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या घटनेत 8 जणांचा मृत्यू - दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करणात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -Russia-Ukraine War 54th day : युक्रेनचा मारियुपोलमध्ये आत्मसमर्पण करण्यास नकार

Last Updated :Apr 18, 2022, 11:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details