Ashok Chavan On Maratha Reservation : ...तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणे अशक्य - अशोक चव्हाण
कोल्हापूर : जोपर्यंत केंद्र सरकार कायद्यात बदल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण (Maratha Reservation ) मिळणे अशक्य असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते गुरुवारी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह येथे एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. केंद्र सरकारने ५० टक्के अट काढल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ लागल्याने यासंदर्भात बैठका आयोजित केल्या जात आहेत. मात्र, मुंबईत दहा बैठका घेतल्या तरी केंद्र सरकारने कायद्यात बदल केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावर सरकारने जनतेची फसवणूक करू नये, असेही चव्हाण म्हणाले.