ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : अजित पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र 'मविआ'तूनच सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

author img

By

Published : Apr 19, 2023, 3:34 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राष्ट्रवादी सोडतील आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अश्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर मंगळवारी अजित पवारांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील चर्चा संपलेली नाही. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की, भाजपकडे अजित पवार यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आमच्याकडे तशी चर्चाही नाही. अजित पवारांनीही आम्हाला संपर्क केलेला नाही. आम्हीही त्यांच्या संपर्कात नाही, या सर्व कपोलकल्पित बातम्या आहे. अजित पवारांचे विरोधक अशा बातम्या तयार करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

BJP State President Chandrasekhar Bawankule
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

नागपूर : अजित पवारांच्या बद्दलच्या बातम्या पेरण्याची सुरुवात संजय राऊत यांनीच केली होती, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवार यांना भेटायला गेले, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाला पेव फुटला. अजित पवारांनी मंगळवारी या सर्व खोट्या बातम्यांची सुरुवात कोणी केली, हे सांगितलेले आहे. संजय राऊत शरद पवारांचे ऐकतात, ऐकत नाही याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. अजित पवारांना गेले दोन वर्षांपासून बदनाम करण्याचा काम केले जात आहेत. त्यांच्या प्रतीमेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमधीलच काही लोक जबाबदार आहेत.


तावडे समिती अस्तित्वात नाही : पक्षामध्ये अशी कोणतीही तावडे समिती तयार झाली नाही. असा कोणताही रिपोर्ट तयार झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप मागे पडतो आहे, असा नरेटिव्ह तयार करण्यासाठी कपोलकल्पित बातमी तयार करण्यात आली आहे. खारघरच्या घटनेबद्दल भाजपमधील सर्वच नेते रुग्णालयापासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. रुग्णालयामध्ये सर्व व्यवस्था भाजप नेते गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होत आहे. तानाजी सावंत ही लक्ष ठेऊन आहेत. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विरोधक खोटे आरोप करत आहेत.


विदर्भ पातळीवरची समन्वय बैठक : गुरूवारी संघ आणि भाजपची विदर्भ पातळीवरची समन्वय बैठक आहे. मी या बैठकीत उपस्थित राहणार आहे. ही नियमितपणे होणारी बैठक आहे. त्यात काही विशेष नाही. पक्ष विस्तार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. तीन कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आमचे लक्ष्य आहे. या माध्यमातून घराघरात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. दर मंगळवारी पक्षात प्रवेश होणार आहे. या मंगळवारीही एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे. मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश ही त्या-त्या वेळेत होतील, मात्र सध्या आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर लक्ष घातले आहे.



'म्हणून' निवडणूका थांबल्या आहेत : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही थांबवलेल्या नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक न्यायालयात गेले आहे. एका प्रकरणात त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. 2011 च्या जनगणनेला डावलून स्वतःहून साडेचार टक्के लोकसंख्या वाढ गृहीत धरून यांनी प्रभाग वाढवले होते. ते नियमाच्या विरोधात होते. त्यामुळेच न्यायालयात पराभव झाला. निवडणुका लवकर होत नाही, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.


नेत्यांचे आम्ही भाजपमध्ये स्वागत करू : शिंदे- फडणवीस सरकार आणि आमचे संपूर्ण आमदार उत्कृष्ट काम करत आहेत, आमदार निधीच्या माध्यमातून विकास केला जातो आहे. महाविकास आघाडी सरकारने आमदारांनी कधीही निधी उपलब्ध करून दिला नाही. शिंदे फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे, त्यामुळे सर्व आमदार काम करत आहेत. फक्त अजित पवार नाही, तर इतर कोणताही नेता भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असेल. तो आमच्या विचारधारेला मान्य करत असेल, तो देशासाठी काम करत असेल. तर त्या सर्व नेत्यांचे आम्ही भाजपमध्ये स्वागत करू, असे बावनकुळे म्हणाले आहेत.


हेही वाचा : Sanjay Raut News: अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.