ETV Bharat / state

आबा तुम्हीच लढा ! ९३ वर्षांचा 'तरूण' तुर्क १४ वी निवडणूक लढणार का?

author img

By

Published : Sep 23, 2019, 2:13 PM IST

Updated : Sep 23, 2019, 3:56 PM IST

सध्याच्या राजकारणात 'आशेचा किरण' वाटावी बोटावर मोजण्याइतकीच माणसे आहेत. ज्यांच्याकडे पाहुण राजकारणातही चांगुलपणा असल्याचे समजते. राजकारणात राहूनही निर्मळ राहता येतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख.

आबा तुम्हीच लढा !

मुंबई - सध्याच्या राजकारणात 'आशेचा किरण' वाटावी बोटावर मोजण्याइतकीच माणसे आहेत. ज्यांच्याकडे पाहुण राजकारणातही चांगुलपणा असल्याचे समजते. राजकारणात राहूनही निर्मळ राहता येतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. तब्बल ११ वेळा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम करणारे देशमुख देशात एकमेव आमदार आहेत. पाहुया त्यांच्याच कारर्किर्दीचा एक आढावा....


विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. येत्या २१ ऑक्टोबरला राज्यात मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वाधिक वेळा निवडून येणारे सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे यावेळी निवडणूक लढवणार का? हा चर्चेचा विषय ठरत आहे. देशमुखांनी आत्तापर्यंत विधानसभेच्या तब्बल १३ निवडणुका लढवल्या आहेत. त्यामध्ये ते ११ वेळा विजयी झाले आहेत.

हेही वाचा - दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती

हेही वाचा - महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास

आबा तुम्हीच लढा -

गेल्या काही दिवसापूर्वीच गणपतराव देशमुखांनी मी येणारी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यावेळीही आबा तुम्हीच लढा! असा कार्यकर्त्यांचा त्यांना आग्रह होत आहे. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी लढणार नसल्याचे गणपतराव देशमुख सांगत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह देशमुख डावलणार की, त्यांच्या प्रेमापोटी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार हा येणारा काळच ठरवेलं.


२०१४ ला देशमुखांनी करुणानिधींचा विक्रम मोडला -
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक १० वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) नेते एम. करुणानिधी यांनी केला होता. मात्र, २०१४ ला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांचा विक्रम मोडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून देशमुख तब्बल ११ वेळा विक्रमी विजय झाले आहेत. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधींच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

१९७२ आणि १९९२ चा अपवाद वगळता सर्व निवडणुकीत विजयी -
गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

बहुतांश वेळा विरोधी बाकावरच -
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा २ वेळा देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. इकते वर्ष विरोधी बाकावर बसूनही गणपतराव देशमुखांना सत्तेचा मोह कधीच झाला नाही.


पक्षांतराच्या काळातही देशमुख एकनिष्ठ -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या पक्षांतराचे पेव फुटले आहे. अशा काळातही गणपराव देशमुख शेकापशी एकनिष्ठ आहेत. कितीतरी दिग्गज नेत्यांनी राजकीय हवेचा अंदाज बघुन दुसऱ्या पक्षात उड्या टाकल्या. मात्र, अशा काळतही देशमुख शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.