ETV Bharat / state

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू

author img

By

Published : Nov 9, 2019, 12:17 PM IST

Updated : Nov 9, 2019, 12:43 PM IST

मुंबई पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात कलम 144 लागू असेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू

मुंबई - अयोध्या राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लगले होते. मुंबई पोलिसांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र जमावबंदीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात भारतीय दंड विधान कलम 144 लागू असेल.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू

हेही वाचा - अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस

या काळात जाहीर सभा घेणे, 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येणे, वाहनातून जमावाला घेऊन येणे याप्रकारच्या वागणुकीला बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे. तसेच, दोषींवर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. या काळात जर परवानगी घेऊन सभा घेणाऱ्यांवर मात्र, पोलीस कारवाई होणार नाही.

Intro:अयोध्या निकालाच्या पर्शवभूमीवर मुंबईत सर्वत्र जमावबंदी चे आदेश मुंबई पोलिसांनी लागू केले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते रविवारी सकाळी 11 पर्यंत हे आदेश लागू असतील. या काळातजाहीर सभा घेउ नये तसेच 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये त्याचप्रमाणे सभासाठी वाहनातून जमावाला घेऊन येणे या सगळ्याला बेकायदेशीर ठरवण्यात येतील तसेच कारवाईही करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत . कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. पण या काळात जर परवानगी घेऊन सभा बोलवली असेल तर त्यावर पोलीस कारवाई होणार नाही.Body:( वॉक थ्रू विजूअल्स जोडले आहेत.)Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.