जालना- Lathicharge in Jalna अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण स्थिती आलीय. गावकऱ्यांकडून दगफेड करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मराठा आक्रोश मोर्चाचा आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस सुरू होता. चर्चेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचेही सांगण्यात येत आहे.
-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर…
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर…
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 1, 2023मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर…
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 1, 2023
जालन्यातील शहागड येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं.आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. त्यात आज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलिस अधिकारी कर्मचारी महीला कर्मचारी जखमी झाले आहेत. काही गावकरीदेखिल जखमी झाले आहेत. दगडफेकीमध्ये २० ते २५ पोलीस जखमी आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
आंदोलकांकडून जाळपोळ-चार दिवसापासून शांततेत असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलयं. वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांनी दोन बस जाळल्या आहेत. दोन बसवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक सुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरुवात केलीय. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा बोलवण्यात आलाय. पोलिसांनी गोळीबार केल्याचाही आंदोलकांकडून आरोप होत आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून सरकारवर टीका केलीय. त्यांनी एक्स या सोशल मीडियात पोस्ट केली आहे. अशोक चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटलयं, की मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होत आहे.
काय आहे मराठा आरक्षणा आंदोलनाची स्थिती- सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने यापूर्वीच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 5 मे 2021 रोजी दिलेल्या निकालात म्हटलं, की सर्वोच्च न्यायालयाच्या 1992 च्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. मराठा आरक्षणाच्या तरतुदीमुळे महाराष्ट्र सरकारनं या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे निरीक्षणदेखील न्यायालयानं नोंदविलं.