ETV Bharat / state

मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस नेत्यांची नाराजी केली दूर?

author img

By

Published : Mar 31, 2019, 12:09 PM IST

बैठकीत मल्लिकार्जुन खरगे केसी वेणूगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री यांनी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही समजूत काढली आहे. किमान लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मल्लिकार्जून खरगे

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी होती. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नाराजी दूर केली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याप्रसंगी नाराज झालेले काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचा व्हिडिओही काँग्रेसने प्रसारित करत यामध्येही कोणीही नाराज नसल्याचे दाखविण्यात आले आहे.

काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्जून खरगे यांची पत्रकार परिषद

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे मत विचारात घेत नाहीत. आपलेच म्हणणे पुढे रेटत असतात, अशा अनेक तक्रारी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे पोहोचल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून खरगे यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक असलेले मधुसूदन तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल हे मुंबईत आले होते. त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेवून त्यावर तोडगा काढला असल्याचे सांगण्यात येत आहे.


मागील आठवड्यातच मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अचानक बदलल्याने काँग्रेसच्या निरुपम विरोधी गोटात उत्साहाचे वातावरण आहे. निरुपम आणि इतर गट मात्र काँग्रेसच्या या निर्णयावर नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनीही अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप करत मागील काही दिवसात काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. आपले कोणी ऐकत नाही, त्यामुळे आपण काँग्रेस सोडून देवू, अशा प्रकारचे वक्तव्य मागील काही दिवसात अशोक चव्हाण यांनी केले होते. या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे केसी वेणूगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री यांनी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही समजूत काढली आहे. किमान लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Intro:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर ?


Body:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर ?

(यासाठी स्टोक व्हीज्वल वापरावेत...काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेतील टाकले होते तेही चालतील)



मुंबई, ता. 30:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी दूर केली असल्याचा दावा काँग्रेसकडून आज करण्यात आला.यासाठी नाराज झालेले काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचा एक व्हिडिओही काँग्रेसने जारी करत आता कोणी नाराज नसल्याचे दाखविण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे मत विचारात घेत नाहीत आपलेच म्हणणे पुढे रेटत असतात, अशा अनेक तक्रारी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीकडे पोहोचल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून खरगे यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक असलेले मधुसूदन तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी देनू गोपाल हे मुंबईत आले होते.त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढला असल्याचे सांगण्यात येते.
निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये कोणताही वाद समोर येणार नाही यासाठीची खबरदारी घेण्यात यावी,अशा सूचना आज मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचेही सांगण्यात येते. तर दुसरीकडे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून माजी खासदार माणिकराव गावित यांनी याच दरम्यान काँग्रेसच्या पक्ष सृष्टीवर नाराज होऊन गेल्याचे सांगण्यात येत असले तरी या संदर्भात गावित नाराज नसल्याचा दावा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी केला.

दरम्यान मागील आठवड्यातच मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अचानक बदलल्याने काँग्रेसच्या निरुपम विरोधी गोटात उत्साहाचे वातावरण असले तरी निरुपम आणि इतर गट मात्र काँग्रेसच्या या निर्णयावर नाराज आहे. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनीही अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागील काही दिवसात तक्रारी केल्या होत्या. आपले कोणी ऐकत नाही, त्यामुळे आपण काँग्रेस सोडून देऊ अशा प्रकारचे वक्तव्य मागील काही दिवसात अशोक चव्हाण यांनी केले होते, या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे केसे वेणुगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री यांनी चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही समजूत काढली असून किमान लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.


Conclusion:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.