ETV Bharat / sports

अजिंक्य रहाणेवर अन्याय होतोय - वेंगसरकर

author img

By

Published : Mar 13, 2019, 10:24 PM IST

अजिंक्य रहाणे, २०१८ साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.

अजिंक्य रहाणे

मुंबई - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे हा एकदिवसीय क्रिकेटमधून संघाबाहेर आहे. त्याला इतर खेळाडूप्रमाणे संघात संधी देण्यात न आल्याने माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर संतापले असून अजिंक्य रहाणेवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अजिंक्य रहाणे, २०१८ साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.

वेंगसरकर बोलताना म्हणाले, की अजिंक्यने स्वत:ला इंग्लंडमध्ये सिद्ध केले आहे. तो उत्तम क्षेत्ररक्षक आहेच. शिवाय चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो. संघ व्यवस्थापनाने त्याला संधी देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय करत आहे आरोप वेंगसरकर यांनी केला आहे.

वेंगसरकर पुढे बोलताना म्हणाले, की अजिंक्य संघात सलामीला अथवा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. चौथ्या क्रमांकावर रायुडू अपयशी ठरत आहे. भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा तिडा अजूनही सुटला नाही. त्या जागी अजिंक्यचा विचार होणे गरजेचे आहे, असे वेंगसरकर म्हणाले.

Intro:Body:

india doing grave injustice to talented and experienced ajinkya rahane says dilip vengsarkar

अजिंक्य रहाणेवर अन्याय होतोय - वेंगसरकर

मुंबई - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे हा एकदिवसीय क्रिकेटमधून संघाबाहेर आहे. त्याला इतर खेळाडूप्रमाणे संघात संधी देण्यात न आल्याने माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर संतापले असून अजिंक्य रहाणेवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.



अजिंक्य रहाणे, २०१८ साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.



वेंगसरकर बोलताना म्हणाले, की अजिंक्यने स्वत:ला इंग्लंडमध्ये सिद्ध केले आहे. तो उत्तम क्षेत्ररक्षक आहेच. शिवाय चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो.  संघ व्यवस्थापनाने त्याला संधी देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय करत आहे आरोप  वेंगसरकर यांनी केला आहे.



वेंगसरकर पुढे बोलताना म्हणाले, की अजिंक्य संघात सलामीला अथवा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. चौथ्या क्रमांकावर रायुडू अपयशी ठरत आहे. भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा तिडा अजूनही सुटला नाही. त्या जागी अजिंक्यचा विचार होणे गरजेचे आहे, असे वेंगसरकर म्हणाले.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.