ETV Bharat / sitara

बदनामीचा खटला रद्द करण्यासाठी कंगणाची हायकोर्टात धाव!

author img

By

Published : Sep 1, 2021, 4:44 PM IST

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्याच्या सुनावणीला सुरुवात झाली असून आज दोन्हा बाजूच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला असून येत्या 9 सप्टेंबर रोजी न्यायालय आदेश घोषित करणार आहे.

कंगणाची हायकोर्टात धाव!
कंगणाची हायकोर्टात धाव!

मु़ंबई- गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीवरून अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध सुरू असलेला बदनामीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात कंगनाने दाखल केली आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयात दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला. एडवोकेट जय भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली तर एडवोकेट सिद्दिकी यांनी कंगना रणौत यांच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला असून येत्या 9 सप्टेंबर रोजी न्यायालय आदेश घोषित करणार आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमध्ये आपले नाव ओढल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी कंगनावर केला आहे. कंगना रणौतच्या याचिकेमध्ये तिच्याविरुद्ध जावेद अख्तरच्या तक्रारीवरून सुरू झालेली बदनामीची कारवाई रद्द करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - वेड्या बहिणीची ही वेडी माया : पाहा, तापसी पन्नूच्या भगिणी प्रेमाचे 15 फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.