ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच भेट झाली नाही; श्रीपाल सबनीस यांनी सांगितला इतिहास

author img

By

Published : Feb 28, 2022, 5:54 PM IST

Updated : Feb 28, 2022, 6:49 PM IST

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. यावर ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

dr shripal sabnis
डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलने करण्यात आली. यासर्व संदर्भात माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना तो इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीच भेट झाली, असे सबनीस म्हणाले.

डॉ. श्रीपाल सबनीस यांची संपूर्ण मुलाखत पाहा या लिंकवर-

VIDEO : समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच - श्रीपाल सबनीस

नेमका छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा इतिहास काय आहे? खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांना भेटले का? समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का? राज्यपाल कोश्यारी यांनी अशा पद्धतीने विधान करणे कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांच्या त्या वक्तव्यानंतर उपस्थित झाले आहेत.

ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झालेली नाही -

स्वराज्याच्या संकल्पनेच्या आणि स्वराज्याच्या निर्मितीत समर्थ रामदास स्वामी यांचा कुठेही वाटा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हतेच. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान हे घातकी, विषारी आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.

राज्यपालांना इतिहास माहिती असायला हवा -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आणि भाजपच्या विचारधारेतून निवड झालेले राज्यपाल आहेत. राज्यपाल पद स्वीकारत असताना इतिहासाचे भान असणे गरजेचे आहे. पात्रता नसणारे, इतिहासाचे भान नसणारे राज्यपाल जर अशा पद्धतीने विचार करत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांच्या पात्रतेविषयी प्रश्न उपस्थित राहतील, असे सबनीस म्हणाले. तसेच राज्यपाल यांनी केलेले विधान निषेधार्य असून, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे देखील यावेळी सबनीस म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि बातमी वाचा या लिंकवर -

समर्थ नसते तर शिवाजी नसते - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Last Updated : Feb 28, 2022, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.