ETV Bharat / city

CORONA VIRUS : राज्यात शनिवारी ३,०७५ नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.05 टक्क्यांवर

author img

By

Published : Sep 11, 2021, 7:39 PM IST

Updated : Sep 11, 2021, 8:02 PM IST

गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे. राज्यात दिवसभरात ३५ केरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra corona update
Maharashtra corona update

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज शनिवारी ३,०७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३०५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ४९,७९६ सक्रिय रुग्ण -

राज्यात आज दिवसभरात ३०५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०२,८१६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३०७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८,०९६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ (११.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४९ हजार ७९६ सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण: आरोपीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती

रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा - जळगावात राष्ट्रवादीमध्ये उफाळली 'भाऊबंदकी'; महानगराध्यक्ष, 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे!


मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३६१
अहमदनगर - ६९३
पुणे - ३७६
पुणे पालिका - १४४
पिपरी चिंचवड पालिका - १०९
सोलापूर - २००
सातारा - १८६
सांगली - २२५

Last Updated : Sep 11, 2021, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.