ETV Bharat / city

Raksha Bandhan 2022 मुंबई महापालिका विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बनवल्या पर्यावरणपूरक राख्या

author img

By

Published : Aug 11, 2022, 9:54 AM IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बृहन्मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यानी पर्यावरण पूरक राख्या सीमेवरील जवानांसाठी बनवल्या आहेत ( Student Made Ecofriendly rakhi ). मुंबई महापालिकेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी 'टाकाऊतून टिकाऊ राख्या' तयार केलेल्या आहेत. या राख्या त्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, कपटे, तुकडे, रंग, कापड यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आहे.

Raksha Bandhan 2022
सीमेवरील जवानांसाठी राख्या

मुंबई रक्षाबंधन हा आपला पारंपारिक सण आज साजरा होत आहे ( rakhi muhurat ). त्याचबरोबर या सणाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Azadi Ka Amrit Mahotsav ) मुंबई महापालिकेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी 'टाकाऊतून टिकाऊ राख्या' तयार केलेल्या आहेत. या राख्या पर्यावरण पूरक असल्यामुळे त्याचे खास महत्व देखील समजून येत आहे ( Student Made Ecofriendly rakhi ). या राख्या त्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, कपटे, तुकडे, रंग, कापड यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांचे उपजत कला गुण आणि कौशल्य हे विकसित व्हावे, त्यात भर पडावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण लक्षात घेऊन पर्यावरण पूरक राख्या विद्यार्थ्यांना तयार करण्याचे सांगितले ( Mumbai Municipal Corporation ). विद्यार्थ्यांनी आपल्या मनाने कुठल्याही प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या पाहूया या संदर्भात सविस्तरपणे वृत्तांत

विविध वस्तूंनी बाजारपेठा सज्ज राखी अर्थात रक्षाबंधन ( raksha bandhan ) हा आपला भारतातला पारंपारिक क्षण आहे. भारताच्या प्रत्येक पारंपरिक सणांमध्ये लोकांचा उत्साह मांगल्य ओसंडून वाहत असते. आपण पाहतो सण आला उत्सवाला कि विविध वस्तूंनी बाजारपेठा सज्ज होतात सजतात. जनता बाजारपेठेमधून वस्तू खरेदी करतात. रक्षाबंधनाच्या काळात आपण बाजारातून अनेक प्रकारच्या राख्या घरी आणतो. बहीण भावाला ओवाळते त्यानंतर राखी बांधते. परंतू अनेक राख्यांमध्ये पर्यावरणाचा नाश करणाऱ्या म्हणजेच प्लास्टिकच्या राख्याचा वापर त्याच्यामध्ये केलेला असतो. अशा प्रकारच्या राख्या सर्वत्र दिसतात. मात्र मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून याला फाटा देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पर्यावरण पूरक राख्यांची योजना राबवली.

सीमेवरील जवानांसाठी राख्या

विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित व्हावे त्यासाठी प्रयत्न मुंबई महानगरपालिकेने आपल्या मुलांना त्यांचे सुप्त कला गुण बाहेर यावे म्हणून विविध मंचावर त्यांना संधी देतात. आपले गुण, कौशल्य सादर करावे यासाठी उपक्रमांची मालिका आखत असतात. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे औचित्य साधून पर्यावरण पूरक राख्या असा विषय मुलांना आणि मुलींना दिला होता. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी या मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक राख्यांमध्ये सहभाग घेतला. घरातील टाकाऊ कागद कपडे रंग यांचा वापर करत त्यांनी उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुबक सुसज्ज अशा राख्या तयार केल्या आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी राख्यांमध्ये तिरंगाची रंगाची राखी बनवली आहे त्यामध्ये विविध खाद्यपदार्थांमधल्या बिया जसे कि, कारल्याची बी, भोपळ्याची बी, डाळिंबाची बी, अशा वेगवेगळ्या बियांचा वापर त्यामध्ये सजावटीसाठी करण्यात आलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे निवडक राख्या या श्रावण महिन्यातील रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून सीमेवरील देश रक्षणा करणाऱ्या जवानांसाठी सुद्धा मुलींनी राख्या पाठवल्या जाणार आहेत. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका सहआयुक्त अजित कुंभार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली .

विद्यार्थ्यांना नागरिक म्हणून जाणीव होण्यासाठी उपक्रम या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुढे त्यांनी नमूद केले स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत लपलेले कलागुण बाहेर यावे त्यांचा विकास व्हावा आणि त्यांनी समाजामध्ये आपल्या कलेद्वारे आपल्या कौशल्याद्वारे स्वतःचा आणि समाजाचाही विकास करावा. तसेच आपला अभ्यास करत असताना पर्यावरण पूरक राखी म्हणजे काय आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अवचित्य म्हणजे काय याचा परस्पर संबंध साधून त्यांनी याबद्दल विचार करावा. म्हणून प्रत्यक्ष त्यांना कृती कार्यक्रम दिला गेला आणि या कृती कार्यक्रमांमध्ये मुलांनी टाकाऊतून टिकाऊ पर्यावरण पूरक राख्या बनवल्या. यासारखे अनेक उपक्रम मुंबई महानगरपालिका राबवत आहे ,असे देखील अजित कुंभार यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना माहिती दिली. याबाबत मनपाच्या सांताक्रुज येथील मनपा शाळेतील विद्यार्थिनी श्रुती राजपूत हिने घरातील टाकाऊ वस्तू पासून पर्यावरण पूरक राखी बनवताना खूप आनंद वाटल्याचे ईटीव्ही भारतला सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग महापालिकेच्या 781 शाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या 2343 विद्यार्थ्यांनी या राखी स्पर्धेत सहभाग घेतला. इयत्ता निहाय विविध माध्यम वापरून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ , राजू तडवी ,उपशिक्षणाधिकारी श्रीम. सुजाता खरे मॅडम, आणि ममता राव मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक करून सर्वांचा उत्साह वाढविला. या संदर्भात विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या कशा केल्या त्याबद्दलच्या भावना देखील व्यक्त केल्या मुंबईतील बोरीवली उपनगर येथील मुंबई पब्लिक बोईसर हिंदी शाळा क्रमांक एक यामधील रचना यादव या विद्यार्थिनीने राख्या कशा बनवल्या याबद्दल आपलं मत सांगितलं

हेही वाचा - Rakshabandhan 2022 अशी सजवा रक्षाबंधन थाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.