ETV Bharat / city

Aurangabad Crime - प्रेमविवाह केल्याने भावाने केली बहिणीची हत्या

author img

By

Published : Dec 5, 2021, 5:02 PM IST

Updated : Dec 5, 2021, 7:07 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात सैराटचीच (Sairat Movie) पुनरावृत्ती झाली असून, प्रेमविवाह केल्याने भावाने बहिणीची कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

Aurangabad Crime
Aurangabad Crime

औरंगाबाद - वैजापुरात सैराटची (Sairat Movie) पुनरावृत्ती झाली असून, प्रेमविवाह केल्याने भावाने बहिणीची कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. प्रेमविवाह केला म्हणून बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवरात राहणाऱ्या तरुणाने बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून, कोयत्याने वार करून तिची हत्या केली. एक महिन्यापूर्वी बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून आले होते. बहिणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याच्या राग मनात ठेवून भावाने बहिणीवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हत्या करणारा भाऊ अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Liquor Store Robbery : कॅशिअरला मारहाण करत तळीरामांनी दारूच्या दुकानाची केली लूट; घटना सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Dec 5, 2021, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.