ETV Bharat / bharat

Lakshmanrao Inamdar: कोण आहेत लक्ष्मण राव इनामदार? ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरू मानतात...

author img

By

Published : Apr 30, 2023, 3:43 PM IST

Prime Minister Narendra Modi And Laxmanrao Inamdar
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्ष्मणराव इनामदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'चा 100 वा भाग आज प्रसारित झाला. ज्यात त्यांनी लक्ष्मणराव इनामदार यांचा राजकीय मार्गदर्शक म्हणून उल्लेख केला होता. लक्ष्मण राव इनामदार कोण आहेत आणि मोदी त्यांना पहिल्यांदा कधी भेटले आणि ते त्यांचे राजकीय गुरू कसे झाले हे जाणून घेऊया.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार 100 व्या भागात मन की बात मधून आज भारतवासीयांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लक्ष्मणराव इनामदार यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी लक्ष्मण राव इनामदार यांचे मार्गदर्शक म्हणून यामध्ये उल्लेख केला आहे. लक्ष्मणराव इनामदार यांनीच समाजजीवनाचे मार्गदर्शन केले, असेही ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi greeting Laxmanrao Inamdar
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष्मणराव इनामदार यांना अभिवादन करताना

लक्ष्मणराव इनामदार कोण होते? : इनामदार यांचा जन्म 1917 मध्ये पुण्याच्या दक्षिणेस 130 किमी अंतरावर असलेल्या खटाव गावात एका सरकारी महसूल अधिकाऱ्याच्या घरी झाला. 10 भावंडांपैकी एक, इमानदार यांनी 1943 मध्ये पूना विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, हैदराबादच्या निजामाच्या राजवटीविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले आणि नंतर गुजरातमध्ये प्रचारक म्हणून सामील झाले. त्यानंतर आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

मोदी पहिल्यांदा इनामदारांना कधी भेटले : 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस, मोदी लहान असताना इनामदार यांना पहिल्यांदा भेटले. त्यावेळी इनामदार हे 1943 पासून गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य प्रचारक होते. ज्यांचे काम राज्यातील तरुणांना संघाच्या शाखांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करणे हे होते. ते वडनगर येथील एका सभेला अस्खलित गुजराती भाषेत संबोधित करत होते. त्यानंतर मोदींनी इमानदार यांना पहिल्यांदा ऐकले आणि त्यांच्या भाषणाने ते पटले.

मोदी त्यावेळी प्रभावीत झाले : मोदींनी 2008 च्या 'ज्योतिपुंज' या पुस्तकात (इनामदारांसह 16 आरएसएस नेत्यांची चरित्रे) लिहिल्याप्रमाणे, 'वकील साहेबांना दैनंदिन उदाहरणे आपल्या श्रोत्यांना पटवून देण्याची क्षमता होती'. एका व्यक्तीला नोकरीमध्ये रस कसा नव्हता आणि इनामदार यांनी नोकरी घेण्यास त्यांना कसे पटवले हे मोदींनी पुस्तकात सांगितले आहे. इमानदारने 'वाजवता येत असेल तर ती बासरी आणि नसेल तर ती काठी' असे उदाहरण दिले होते.

मोदींचा RSS प्रवास : 17 वर्षीय मोदींनी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर 1969 मध्ये वडनगर येथील आपले घर सोडले. 2014 मध्ये प्रसिद्ध झालेल्या किशोर मकवाना यांच्या कॉमन मॅन नरेंद्र मोदी या पुस्तकात ते म्हणाले होते, 'मला काहीतरी करायचं होतं, पण काय करावं तेच कळत नव्हतं.' कोलकाताजवळील हुगळी नदीच्या काठावरील राजकोटमधील मिशन आश्रमापासून ते बेलूर मठापर्यंत, त्यांनी रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयात वेळ घालवला आणि नंतर गुवाहाटीला प्रयाण केले.

मोदी पुन्हा अहमदाबादला रवाना झाले : नंतर ते हिमालयाच्या पायथ्याशी अल्मोडा येथे स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या दुसर्‍या आश्रमात पोहोचले. दोन वर्षांनी ते वडनगरला परतले. त्यांच्या घरी काही काळ मुक्काम केल्यानंतर, मोदी पुन्हा अहमदाबादला रवाना झाले, जिथे ते राहत होते आणि त्यांच्या काकांनी चालवलेल्या चहाच्या स्टॉलवर काम केले. येथेच त्यांनी वकिल साहेबांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला, जे त्यावेळी शहरातील हेडगेवार, RSS मुख्यालय येथे राहत होते.

बायको अजूनही त्यांची वाट पाहत होती : मुखोपाध्याय म्हणतात, 'इनामदार मोदींच्या आयुष्यात पुन्हा आले. ज्यावेळी ते चौकाचौकात होते. मुखोपाध्याय म्हणतात की मोदींनी 1968 मध्ये लग्नापासून दूर जाण्यासाठी घर सोडले. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दिसले की त्यांची बायको अजूनही त्यांची वाट पाहत आहे. म्हणून, ते अहमदाबादला निघून गेले. एकदा मोदी हेडगेवार भवनात त्यांच्या गुरूंच्या आश्रयाने गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

इनामदारांचा मोदींवर प्रभाव : मोदींच्या जीवनावर पुस्तक लिहिणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की मोदींच्या जीवनावर जर कोणाचा सर्वात जास्त प्रभाव पडला असेल तर तो लक्ष्मणराव इनामदार यांचा. सामाजिक प्रश्नांवरची पकड, कडक शिस्त आणि सतत काम करण्याची क्षमता मोदींनी इनामदार यांच्याकडून शिकून घेतली आहे. मोदींनाही योग आणि प्राणायामाची सवय इनामदार यांच्याकडूनच लागली. इनामदार यांना वकील साहेब म्हणूनही ओळखले जात होते. 1984 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा : India's First Cable-stayed Bridge: देशातील पहिल्या केबल आधारित रेल्वे पुलाचे काम पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.