ETV Bharat / bharat

Taslima Nasrin exclusive इस्लाममध्ये क्रिटिकल स्क्रूटनीला वाव नाही बोलले की मृत्यू निश्चित अशी लेखिका तस्लीमा यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 17, 2022, 9:18 AM IST

Updated : Aug 17, 2022, 11:24 AM IST

इस्लाममध्ये critical scrutiny गुण दोष तपासनीला वाव नाही Taslima Nasrin exclusive interview with etv bharat आणि ज्यांनी असा विचार मांडला Taslima Nasrin on attack on salma rushdie ते संपले. उलट तुम्ही असेही म्हणू शकता की, इस्लाम आता इस्लाम राहिलेला नाही, तर तो राजकीय इस्लाम झाला आहे. त्यावर राजकारणाचा Taslima Nasrin says no scope of critical scutiny in islam प्रभाव आहे, असे लेखिका तस्लीमा नसरीन म्हणाल्या.

Taslima Nasrin exclusive interview with etv bharat
सलमान रश्दी यांच्यावर हल्ला तस्लीमा नसरीन यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली इस्लाममध्ये critical scrutiny गुण दोष तपासनीला वाव नाही Taslima Nasrin exclusive interview with etv bharat आणि ज्यांनी असा विचार मांडला ते संपले. उलट तुम्ही असेही Taslima Nasrin on attack on salma rushdie म्हणू शकता की, इस्लाम आता इस्लाम राहिलेला नाही, तर तो राजकीय इस्लाम झाला आहे. त्यावर राजकारणाचा प्रभाव आहे. इतर धर्मांप्रमाणे येथे सुधारणावादी Taslima Nasrin says no scope of critical scutiny in islam विचार फुलू दिला गेला नाही, असे मत प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी व्यक्त केले. तल्सीमा यांच्याशी ईटीव्ही भारतचे नॅशनल ब्यूरो चीफ राकेश त्रिपाठी यांनी चर्चा केली.

हेही वाचा Ghulam Nabi Azad resigned आझाद यांनी जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर लगेच दिला राजीनामा

इस्लाममध्ये सुधारणा झाल्या नाहीत कारण येथे गुण दोष तपासणीला वाव नाही असे नसरीन यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर उत्तर देताना ईटीव्ही भारतला सांगितले. तसेच, सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पुढचा नंबर तुमचा आहे, अशा धमक्याही आपल्याला ट्विटरवरून मिळत असल्याचे नसरीन म्हणाल्या.

प्रश्न सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आपला समाज काळाबरोबर पुढे जाण्याऐवजी मागे जात आहे का?

उत्तर जगात सर्वत्र हे वाढत आहे. यासाठी लोकांना खूप काळजी घ्यावी लागेल. हे थांबायला हवे. असेच कोणी कोणाला मारू शकत नाही.

प्रश्न ते थांबवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? भारतातही 'सर तन से जुदा' अशा घोषणा दिल्या जात आहेत.

उत्तर हे जगभर घडत आहे. जेव्हा अमेरिकेसारख्या ठिकाणी सलमान रश्दींना इतकी सुरक्षा मिळाली असताना असे घडू शकते तर हे कुठेही होऊ शकते. मुस्लीम समाजात कट्टरतावाद वाढण्यापासून रोखले तरच अशा घटनांना आळा बसेल. कट्टरतावाद वाढला नाही तर दहशतवादही वाढणार नाही. मात्र, यासाठी खूप काम करावे लागणार आहे. कारण कट्टरतावाद वाढवणाऱ्यांचे लक्ष्य २५ - २६ वर्षांची मुले आहेत. ते सहज ब्रेनवॉश होतात. धार्मिक नेते हे काम सहज करतात. हे थांबवले तर सर्व काही ठीक होईल. यामध्ये इंटरनेटवर अतिशय धोकादायक माहितीही दिली जाते, ती वाचून कोणताही तरुण दहशतवादाकडे वळतो.

प्रश्न मदरशे कट्टरतावाद पसरवतात असे तुम्हाला वाटते का?

उत्तर असे काही मदरसे आहेत जे शिक्षण देण्याऐवजी धार्मिक विष पसरवतात. आता सरकारला या गोष्टीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यावर सरकारी नियंत्रण आवश्यक आहे.

प्रश्न या प्रकरणावर सरकारचे (भारत सरकार) काही नियंत्रण आहे, असे तुम्हाला वाटते का?

उत्तर मी या सरकारबद्दल बोलतही नाही. हे मी जगभरातील सरकारांना सांगत आहे. जगभरातील मदरशांमधून ब्रेन वॉशिंग केले जात असल्याने प्रत्येक देशाच्या सरकारने या मदरशांवर लक्ष ठेवले पाहिजे, त्यांना आपल्या ताब्यात ठेवावे. कारण दहशतवाद हा एक विचार आहे, तो अशाच प्रकारे संपवता येईल. दहशतवाद्याला मारून दहशतवाद संपणार नाही. या विचाराला संपुष्टात आणावे लागेल आणि मदरशांवर नियंत्रण ठेवून ते शक्य होईल. दहशतवाद हा संसर्गजन्य आहे, हा एक असा विचार आहे जो एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि तसाच पुढे जातो, पसरते.

प्रश्न जेव्हा आपण दहशतवादाबद्दल बोलतो तेव्हा घुमून फिरून मुद्दा इस्लामवरच का येतो?

उत्तर वास्तविक इस्लाममध्ये सुधारणा झालेली नाही. त्या धर्माचा विकास झालेला नाही. त्यात कोणतीही गंभीर तपासणी शक्य नाही. कोणत्याही प्रकारच्या सुधारणेची चर्चा केली तर मारले जाते. त्यामुळे, जर कोणत्याही सुधारणांसाठी टीका करणेच शक्य नसेल, तर स्त्री-पुरुष समानतेची चर्चा कशी होणार? धार्मिक कायदे मानवी हक्क आणि न्यायावर आधारित असले पाहिजेत. या सुधारणांबद्दल कोणी बोलले तर जातीयवादी शक्ती त्याला मारायला येतात. त्यांच्यावर सरकार कधीच अंकुश ठेवणार नाही. मुस्लीम देशांची सरकारे आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात. म्हणूनच मुस्लीम देशांनी कधीही राज्य आणि धर्म वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. या देशांमध्ये आधुनिक कायदा लागू करण्याचा कधीही प्रयत्न केला जात नाही. ते सातव्या शतकातील कायद्याचे पालन करतात आणि सरकारे ते बदलण्याचा प्रयत्नही करत नाहीत, कारण त्यांना त्या धार्मिक कायद्यांचा राजकीय वापर करावा लागतो. म्हणूनच इस्लाम आता फक्त इस्लाम राहिलेला नाही, तो राजकीय इस्लाम बनला आहे आणि हा बदल अत्यंत धोकादायक आहे. त्यांचा धर्म जिवंत ठेवण्यासाठी त्यांना रक्ताची गरज आहे. ते खूप धोकादायक आहे.

प्रश्न सलमान रश्दी यांच्यावरील हल्ला हा संपूर्ण लेखक समाजावर हल्ला असे तुम्ही मानता का?

उत्तर सर्वच लेखकांवर हल्ला होत नाही. इस्लाममध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या, इस्लामचा विकास करू इच्छिणाऱ्या लेखकांवर हल्ले होत आहेत. मलाही मारण्याचा फतवा काढण्यात आला, माझ्याही डोक्यावर बक्षीस ठेवण्यात आले, त्यामुळे सर्वच लेखक नाही तर काहींना धोका आहे. अलीकडेच सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुस्लीम देशांमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील तहरीक-ए-लब्बैकचा संस्थापक खादिम रिझवी माझ्याबद्दल एका बैठकीत म्हणाला की आम्ही सलमानचे काम केले आहे, आता तस्लिमाला मारावे लागेल. त्याचे हे वक्तव्य पाकिस्तानातील सुमारे 20 लाख लोकांनी ऐकले. त्यानंतर पुन्हा ट्विटरवर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पुढचा नंबर माझाच असल्याचे सांगितले जात आहे. सलमान रश्दी बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात आणि पूर्ण पोलीस संरक्षणात राहतात, त्यामुळे ते वाचले. बहुतांश लेखक ज्यांना इस्लाममध्ये सुधारणा करायची आहे किंवा त्याला आधुनिक विचारसरणीचा आधुनिक इस्लाम बनवायचा आहे त्यांना मोठा धोका आहे. कारण त्यांना पोलीस संरक्षण नाही आणि ते सहजपणे कट्टरवाद्यांचे लक्ष्य बनू शकतात. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍या आणि इस्लामबद्दल त्यांच्या विचारसरणीसाठी लक्ष्य केलेल्या लोकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

प्रश्न सलमान रश्दींसाठी काही संदेश?

उत्तर मी या हिंसाचाराचा विरोध करते. जेव्हापासून हे सर्व सुरू झाले तेव्हापासून माझा नेहमीच हिंसेला विरोध आहे.

प्रश्न नूपुर शर्मासंबंधात भारतातही अशा घटना घडल्या आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?

उत्तर माझ्यावर खूप हल्ले झालेत, जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. जो कोणी इस्लाममध्ये सुधारणा करण्याविषयी बोलतो त्यांना अधिक लक्ष्य केले जाते. नुपूर शर्माच्या बाबतीतही तेच घडत आहे. उदयपूरमध्ये या लोकांनी कन्हैयाची ज्या पद्धतीने हत्या केली, ते अतिशय धोकादायक आहे. त्यांचा धर्म इतका कमकुवत, नाजूक आहे की त्याला वाचवण्यासाठी इतरांना मारावे लागेल? यावरून त्यांचा धर्म मजबूत नाही हे सिद्ध होते. हे इस्लाम धर्मासाठी चांगले नाही.

हेही वाचा Police Naxalite encounter in Sukma बस्तरच्या सुकमामध्ये पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक

Last Updated : Aug 17, 2022, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.