ETV Bharat / bharat

'नेताजींचे काम, आयुष्य अन् निर्णय हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी'

author img

By

Published : Jan 23, 2021, 7:55 PM IST

मोदी
मोदी

पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आयोजीत कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले. त्यांनी नेताजींना आदरांजली वाहिली.

कोलकाता - आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती आहे. पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आयोजीत कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले. त्यांनी नेताजींना आदरांजली वाहिली. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या आधुनिक सैन्याचे निर्माते होते. नेताजींसारख्या महापुरुषाला कोटीकोटी प्रणाम, असे मोदी म्हणाले.

कोलकता येथे नेताजींच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्यात आला आहे. आज मोदींच्या हस्ते नेताजींच्या आयुष्यावरील कायमस्वरुपी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेल्या नाण्याचे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

मोदींच्या भाषणातील मुद्दे -

  • आजच्या दिवशी भारताच्या पुत्राने जन्म घेतला होता. ज्यांनी आझाद भारताच्या स्वप्नाला दिशा दिली. तर मी तुम्हाला स्वातंत्र्य मागणार नाही, मी काढून घेईन, असे ते इंग्रजांना म्हणाले होते.
  • दरवर्षी आपण नेताजींची जयंती 23 जानेवारीला 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करू. नेताजी हे भारताच्या सामर्थ्य आणि प्रेरणेचे प्रतिबिंब आहेत.
  • 2018 मध्ये आम्ही अंदमान बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे ठेवण्यात आले. देशाची भावना लक्षात घेऊन नेताजींशी संबंधित फायलीही सरकारने सार्वजनिक केल्या.
  • आज भारताला स्वावलंबी बनविणे आहे. दारिद्र्य, निरक्षरता, रोग या देशातील सर्वात मोठ्या समस्या आहेत, असे नेताजी मानत. आपल्याया सम्याविरोधात लढायचे आहे. दारिद्र्य, निरक्षरता, रोग आणि वैज्ञानिक उत्पादनाचा अभाव आहे. या समस्या सोडविण्यासाठी समाजाला एकत्र यावे लागेल, आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.