ETV Bharat / bharat

Agnipath Scheme: अग्निपथ'विरोधात काँग्रेस आक्रमक! राहुल गांधींच्या उपस्थितीत जंतरमंतरवर 'सत्याग्रह'

author img

By

Published : Jun 19, 2022, 4:13 PM IST

Updated : Jun 19, 2022, 4:26 PM IST

अग्निपथ योजनेवरून काँग्रेसने देशभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांसोबत काँग्रेस मैदानात उतरली असून आपली एकजूट दाखवत काँग्रेस खासदार आणि नेत्यांनी रविवारी जंतरमंतरवर 'सत्याग्रह' केला. ( Congress Aggressive Against the Agnipath Scheme ) या सत्याग्रहामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीही उपस्थिती आहेत.

अग्निपथ'विरोधात काँग्रेस आक्रमक! राहुल गांधींच्या उपस्थितीत जंतरमंतरवर 'सत्याग्रह'
अग्निपथ'विरोधात काँग्रेस आक्रमक! राहुल गांधींच्या उपस्थितीत जंतरमंतरवर 'सत्याग्रह'

नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी रविवारी (19 जुन)रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निपथ योजनेबाबत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून पंतप्रधानांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या 'अग्नीपाथ'वर चालण्यास भाग पाडले आहे. तसेच, 8 वर्षात 16 कोटी नोकऱ्या निर्माण करायच्या होत्या पण तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले असा घणाघातही त्यांनी केला आहे. या योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जंतरमंतरवर सत्याग्रह पुकारला आहे त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.

  • बार-बार नौकरी की झूठी उम्मीद दे कर, प्रधानमंत्री ने देश के युवाओं को बेरोज़गारी के ‘अग्निपथ’ पर चलने के लिए मजबूर किया है।

    8 सालों में, 16 करोड़ नौकरियां देनी थीं मगर युवाओं को मिला सिर्फ़ पकोड़े तलने का ज्ञान।

    देश की इस हालत के ज़िम्मेदार केवल प्रधानमंत्री हैं।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून पंतप्रधानांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या 'अग्नीपाथ'वर चालण्यास भाग पाडले आहे. आठ वर्षात 16 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, पण तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले आहे. देशाच्या या अवस्थेला केवळ पंतप्रधानच जबाबदार असल्याचही ते म्हणाले आहेत.

गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना रविवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. शनिवारी रात्री नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात गांधी म्हणाले की, देशातील तरुण संतप्त झाले आहेत आणि रस्त्यावर आंदोलन करत आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहनही त्यांनी केले होते.

सशस्त्र दलात भरतीसाठी केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेवरून सरकारवर दबाव आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जंतरमंतरवर सत्याग्रह केला. ( Agneepath Scheme ) या सत्याग्रहात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे नेते- जयराम रमेश, राजीव शुक्ला, सचिन पायलट, सलमान खुर्शीद आणि अलका लांबा यांनी सहभाग घेतला. ही योजना विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याने सरकारने तात्काळ मागे घ्यावी, असे काँग्रेसची मागणी आहे. दरम्यान, काँग्रेसकडून होत असलेल्या सत्याग्रहासाठी जंतरमंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या योजनेच्या विरोधात देशभरातील मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक शहरे आणि शहरांमधून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. सरकार गरीब आणि तरुणांसाठी काम करत नसून बड्या उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा घणाघात प्रियांका गांधी यांनी यावेळी केला आहे. त्याचवेळी सचिन पायलट म्हणाले की ही योजना मागे घेण्यात यावी तसेच, आंदोलक तरुणांना हिंसाचार करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेला विरोध करणे हा त्यांचा तरुणांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलनादरम्यान हिंसा होऊ नये असही ते म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले, सत्याग्रह हा सत्याशी संबंधित आहे, जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहाल, जेंव्हा सत्यासोबत नसलेल्याला विरोध कराल तो सत्याग्रह असेल. आम्ही देशातील तरुणांना सांगू की त्यांनी शांततेने आंदोलन करावे, ही देशाची बाब आहे आणि लष्कराची बाब आहे, या प्रकरणावर कोणताही हिंसाचार होता कामा नये असही ते म्हणाले आहेत.

या योजनेला काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना पाठिंबा दिल्यावर सलमान खुर्शीद म्हणाले की, मनीष आमचा मित्र आहे आणि त्याला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमच्या नेत्यांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, मनीषमध्ये बंडखोरी झाली असे नाही, प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. दुसरीकडे, एक मोठा निर्णय घेत गृह मंत्रालयाने अग्निपपथ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांसाठी CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, देशाच्या अनेक भागांमध्ये वादग्रस्त संरक्षण भरती योजनेला तरुण विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांत, आंदोलकांनी रेल्वे स्थानकांची तोडफोड करणे, गाड्या पेटवल्या आणि विविध शहरे आणि शहरांमधून रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या शुक्रवारी, निषेधाचा एक भाग म्हणून, तेलंगणातील सिकंदराबादमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. संतप्त तरुणांनी निदर्शने करताना अनेक गाड्या जाळल्या, खासगी, सार्वजनिक वाहने, रेल्वे स्थानकांची तोडफोड करण्यात आली आणि महामार्ग आणि रेल्वे मार्ग रोखण्यात आले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 14 जून रोजी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेत साडेसतरा ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद आहे, त्यापैकी 25 टक्के कायम ठेवण्याची तरतूद आहे. नंतर, सरकारने 2022 मध्ये भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्षे केली. नवीन योजनेंतर्गत भरती करण्यात येणारे कर्मचारी अग्निवीर म्हणून ओळखले जातील. लष्करी कर्मचाऱ्यांचे सरासरी वय कमी करणे आणि वाढत्या पगार आणि निवृत्ती वेतनात कपात करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा - अग्निपथ योजना मागे घेण्याची काँग्रेसची मागणी, कन्हैया कुमार म्हणाला- 'ही योजना नाही, घोटाळा आहे'

Last Updated : Jun 19, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.