ETV Bharat / bharat

देशात आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा, काळजीची गरज नाही; लॉकडाऊन वाढवल्यानंतर शाहांची प्रतिक्रिया..

author img

By

Published : Apr 14, 2020, 3:19 PM IST

देशाचा गृहमंत्री म्हणून मी लोकांना याची खात्री देतो, की आपल्याकडे अन्न, औषध आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी करू नये. अशा आशयाचे ट्विट शाह यांनी केले. यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Enough stock of essential commodities, no need to worry: Shah on lockdown
देशात आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा, काळजीची गरज नाही; लॉकडाऊन वाढवल्यानंतर शाहांची प्रतिक्रिया..

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली, की देशात अन्नधान्याचा तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे ते म्हणाले.

देशाचा गृहमंत्री म्हणून मी लोकांना याची खात्री देतो, की आपल्याकडे अन्न, औषध आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी करू नये. अशा आशयाचे ट्विट शाह यांनी केले. यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

  • देश के गृह मंत्री के नाते मैं जनता को पुनः आश्वस्त करता हूँ कि देश में अन्न, दवाई व अन्य रोजमर्रा की चीज़ों का प्रयाप्त भण्डार है, इसलिए किसी भी नागरिक को परेशान होने की आवश्यकता नहीं है। साथ ही संपन्न लोगों से निवेदन करता हूँ कि आप आगे आकर आसपास रहने वाले गरीबों की सहायता करें।

    — Amit Shah (@AmitShah) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • इस लड़ाई में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हमारे डॉक्टर, स्वास्थ्यकर्मी, सफाई कर्मचारी, पुलिसबल व सभी सुरक्षाकर्मियों का योगदान दिल को छू लेने वाला है। इस विषम परिस्थिति में आपका यह साहस और समझदारी हर भारतवासी को प्रेरित करती है। सभी लोग दिशानिर्देशों का पालन कर इनका सहयोग करें।

    — Amit Shah (@AmitShah) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आता आपल्याला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, की सर्व नागरिक लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहेत, तसेच कोणालाही गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासत नाहीये. यावेळी राज्य सरकार, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस व सुरक्षा कर्मचारी हे सर्व अगदी प्रशंसनीय काम करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनाची झळ आपल्याला तितकीशी बसत नाहीये. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन या सर्वांना सहकार्य करावे. असेही ते पुढे म्हटले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. देशात सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : देशातील लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची घोषणा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.