मुंबई - ठाकरे सरकार (Thackeray Government) की दादागिरी नही चलेगी. उद्धव ठाकरे यांना असं वाटतंय की ठोकशाही खपवून घेतली जाईल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court on BJP Mla) आजच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही हे स्पष्ट झाले आहे, न्यायालयाने आधी अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवले आणि आता हा दिलासा दिला, त्यामुळं ठोकशाही चालणार नाही हे स्पष्ट झालं, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिली आहे.